कोल्हापुर : मागील काही दिवसापासून कोल्हापुर लोकसभा मतदारसंघावरून ठाकरे गट आणि कॉंग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. कोल्हापुरची जागा सध्या ठाकरे गटाकडे असून शाहू महाराजांनी मशाल चिन्हावर निवडणुक लढवावी, अशी भूमिका राऊतांनी घेतली आहे. तर दुसऱ्या बाजूला शाहु महाराज यांनी कॉंग्रेसकडून ही निवडणुक लढवावी, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. त्यावर आता माजी खासदार संभाजी राजे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“आता संसदेतूनच आवाज उठवणार!” वडेट्टीवारांची कन्या लोकसभेसाठी इच्छूक
लोकसभा निवडणुकीत स्वराज्य पक्षाची भूमिका राज्यात कुठेही नसणार नाही. आम्ही फक्त कोल्हापुर याठिकाणी लक्ष केंद्रीत केलं आहे. एकदा शाहू महाराजांचं ठरलं की आम्ही फक्त कोल्हापुर जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत करणार आहोत. शाहू महाराज सांगतील ती आमची भूमिका राहणार आहे. शाहू महाराज यांचं लढण्याचं ठरलं आहे. त्यामुळे मी लोकसभा निवडणुक लढण्याचा याठिकाणी प्रश्नच येत नाही. असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा…महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यावर होणार शिक्कामोर्तब, आंबेडकरही बैठकीला उपस्थित राहणार
दरम्यान, कोल्हापुर लोकसभा मतदारसंघाबाबतही आज मुंबईत महाविकास आघाडीत चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. हॉटेल फोरमध्ये महाविकास आघाडीची बैठक होत असून प्रकाश आंबेडकरांसह महाविकास आघाडीतील प्रमुख नेते याबैठकीला उपस्थित झाले आहेत. त्यामुळे कोल्हापुरसह इतर जागा आता कुणाला वाट्याला येणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवारांना आता सपोर्ट करण्याची गरज”, अजित पवारांच्या पुतण्याचं वक्तव्य
हेही वाचा…लोकसभेसाठी भाजपच्या संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर, फॉर्म्युलाही ठरला
हेही वाचा…“तर अजित पवार अन् शिंदेंच्या उमेदवारांना कमळावर निवडणुक लढवावी लागेल”, महायुतीत मोठी खलबतं
२२-१८-०९ महाविकास आघाडीचा फॉर्म्युला, मुंबईत आज महत्वाची बैठक
हेही वाचा…“ठाकरेंना मोदींसोबत यावचं लागणार, अंदाज चुकणार नाय”, शिंदें गटातल्या आमदाराचा मोठा दावा