मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांची घोषणा पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जागावाटपासाठी आता महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये खलबतं सुरू झाली आहेत. अशातच राज्यात दोन मोठ्या पक्षात फुट पडल्यानंतर राज्यात ही पहिलीच निवडणुक आहे. त्यामुळे या निवडणुकांकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. यातच आता उद्धव ठाकरे केव्हाही भाजपसोबत येऊ शकतात. असा दावा शिंदे गटातील आमदार शाहाजी बापू पाटील यांनी केला आहे.
हेही वाचा…“लोकसभा निवडणुकीत मराठा समाज देणार ५०० उमेदवार, मराठा समाज देणार मोठा दणका
एक हजार टक्के उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र येणार हे आज तुम्हाला सांगतो. आपला अंदाज चुकणार नाही. दिवस कुठला हे बघावं लागेल. पण हे व्हावचं लागेल कारण हिंदुत्वाचा विचार त्यामागे आहे. हिंदुत्वाचा विचार बाजूला ठेवता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे उद्धव ठाकरेंना जावं लागण्याचा दिवस येणार आहे. असं विधान शाहाजी बापू पाटील यांनी केलं आहे.
हेही वाचा…२३ जागांचा प्रस्ताव घेऊन ठाकरे पवारांच्या भेटीला, मुंबईत जागावाटपांबाबत खलबत्तं
राम मंदिर बांधल्यापासून एक वेगळं वातावरण आहे. अशा वातावरणात जर उद्धव ठाकरे यांना वाटलं की आपणही भाजपसह जावं तर त्यात गैर काही नाही. महायुतीला लोकसभा निवडणुकीत ४५ जागा मिळतील असा दावाही पाटील यांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आता संसदेतूनच आवाज उठवणार!” वडेट्टीवारांची कन्या लोकसभेसाठी इच्छूक
हेही वाचा…महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यावर होणार शिक्कामोर्तब, आंबेडकरही बैठकीला उपस्थित राहणार
हेही वाचा…“हा कावा महाराष्ट्रात चालणार नाही, वाऱ्या तुमच्या, पण वारे आमचेच”, ठाकरेंच्या शिलेदारांने थेट शाहांनाच दिले चॅलेंज
“राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार करा”, अमित शाह यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश
हेही वाचा…“महाराष्ट्र ५० वर्षांपासून तुमचा भार सोसतोय,”पहिल्याच सभेत अमित शाहांकडून शरद पवारांचा समाचार