अहमदनगर : विरोधी पक्षांकडून आधीच बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी होत असताना आता राज्यात सकल मराठा समाज लोकसभा मतदारसंघात प्रत्येक गावातून दोन उमेदवार देणार आहे. प्रत्येक मतदारसंघात किमान ५०० उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ईव्हीएम वर मर्यादा आहेत. अशा स्थितीत निवडणुक आयोग बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या लागतील असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तर वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही होईल असे निवडणुक अधिकारी सांगत आहेत.
हेही वाचा…महाविकास आघाडीकडून वंचितला ४ ते ५ जागा, उद्या महत्वाची बैठक
ईव्हीएम मशीनवर ३७४ उमेदवारांसाठी मतदान करण्यासाठी सुविधा उपलब्ध आहे. यापेक्षा जास्त उमेदवार असतील तर ईव्हीएमला मर्यादा आहेत. लोकसभा निवडणुकीत पाचशे उमेदवार असतील तर त्याबाबत वरिष्ठांकडून जे निर्देश येतील. त्यानुसार कार्यवाही होईल. असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…“शिंदे गटाच्याच खासदार अन् मंत्र्यांत मोठा वाद,” भावना गवळीच्या समर्थकांची राठोड विरोधात पोस्टरबाजी
मोठ्या प्रमाणात ईव्हीएम उपलब्ध करणे कठीण होणार आहे. बुथनिहाय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण,वाढत्या कर्मचारी संख्याबळाची समस्या, एवढी मोठी मतदार यादी ईव्हीएमवर असेल तर मतदार संभ्रित होऊ शकतो. राजकीय पक्षांच्या प्रभावावर परिणाम होऊ शकतो. अशी शक्यता आता व्यक्त केली जाऊ लागली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…२३ जागांचा प्रस्ताव घेऊन ठाकरे पवारांच्या भेटीला, मुंबईत जागावाटपांबाबत खलबत्तं
हेही वाचा..नवनीत राणांची महायुतीकडून उमेदवारी निश्चित, आनंद अडसुळांना राणांचा प्रचार करावा लागणार
हेही वाचा…नांदेडचं राजकीय वारं फिरलं, चिखलीकरांचा पत्ता कट होणार, अशोक चव्हाण नवा उमेदवार मैदानात उतरवणार
हेही वाचा…महायुतीच्या संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर, भाजप २३ तर शिंदेंच्या शिवसेनेला २२ जागा ?
हेही वाचा…येत्या १४ मार्च रोजी लोकसभा निवडणुकांची होणार घोषणा, एकूण सात टप्प्यात होणार मतदान