मुंबई : गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या जागावाटपाच्या चर्चेवर आज शिक्कामोर्तेब होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीची मुंबईत लोकसभा निवडणुक जागावाटपाबाबत बैठक होत आहे. याबैठकीला महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांसह वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर देखील उपस्थितीत राहणार आहेत. राज्यातील काही जागांवरून वाद होता. परंतु या बैठकीत तो वाद आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा….नवनीत राणांची महायुतीकडून उमेदवारी निश्चित, आनंद अडसुळांना राणांचा प्रचार करावा लागणार
काल उद्धव ठाकरे यांनी २२ जागांचा प्रस्ताव घेऊन शरद पवारांची भेट घेतली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ज्या जागा लढवल्या होत्या. त्या सर्व जागांसाठी ठाकरे गट आग्रही आहे. तर दुसऱ्या बाजूला कॉंग्रेस देखील पंधरा ते अठरा जागांसाठी इच्छूक आहेत. यातच वंचितने महाविकास आघाडीकडे २७ जागांचा प्रस्ताव ठेवला होता. त्यातील पाच ते सहा जागा वंचितला देण्यात येतील, असे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आधीच स्पष्ट केले आहे.
हेही वाचा…नांदेडचं राजकीय वारं फिरलं, चिखलीकरांचा पत्ता कट होणार, अशोक चव्हाण नवा उमेदवार मैदानात उतरवणार
तर शरद पवार गट आठ ते दहा जागांवर आग्रही असून त्या सर्व जागांची तयारी सुरू केली आहे. यातच वंचितचा महाविकास आघाडीत समावेश झाल्याने महायुतीसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून जागावाटपाच्या संदर्भातही महायुतीत चर्चा झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात लोकसभेच्या उमेदवारांचीही घोषणा होण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“हा कावा महाराष्ट्रात चालणार नाही, वाऱ्या तुमच्या, पण वारे आमचेच”, ठाकरेंच्या शिलेदारांने थेट शाहांनाच दिले चॅलेंज
“राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार करा”, अमित शाह यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश
हेही वाचा…“महाराष्ट्र ५० वर्षांपासून तुमचा भार सोसतोय,”पहिल्याच सभेत अमित शाहांकडून शरद पवारांचा समाचार
हेही वाचा…“लोकसभा निवडणुकीत मराठा समाज देणार ५०० उमेदवार, मराठा समाज देणार मोठा दणका
हेही वाचा…२३ जागांचा प्रस्ताव घेऊन ठाकरे पवारांच्या भेटीला, मुंबईत जागावाटपांबाबत खलबत्तं