अहमदनगर : मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर सेनेच्या 40 आमदारांना गद्दार म्हणून म्हटलं गेलं. उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे आपल्या जाहीर सभांमधून बंडखोर आमदारांचा उल्लेख उघडपणे गद्दार म्हणून करू लागले. त्याला प्रत्युत्तर म्हणून बंडखोर आमदार देखील यावर भाष्य करताना दिसत आहेत. यातच अहमदनगरच्या दौऱ्यावर असताना बंडखोर आमदार आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी देखील यावर भाष्य केलं आहे.
“तरुणांच्या हाताला रोजगार कधी मिळणार ते सांगा”; अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं
काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेनेचे नुकसान झाले. शिवसैनिकांचे नुकसान झाले, ते थांबण्यासाठी आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांसाठी आम्ही ही भूमिका घेतली. त्यामुळे आम्हाला गद्दार म्हणता येणार नाही. असं देसाई म्हणाले. त्याचबरोबर दसरा मेळाव्याबाबत बोलताना ते म्हणाले की, शिंदे गटाने घेतलेली भूमिका ही सर्व सामान्य जनतेने स्वीकारलेली आहे. महाराष्ट्रातील जनता कोणाबरोबर आहे हे दसऱ्याच्या दिवशी दिसेल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
“रामदास कदमांनी महाराष्ट्रात फिरून दाखवावं”; सुषमा अंधारेंनी दिला कदमांना इशारा
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जे आमदार गेले आहेत. त्यांनी कोणीही अद्यापही शिवसेना सोडली नाही. ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारांपासून शिवसेनेला बाजूला सारलं जात आहे. आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीतून फारकत घेतली आहे. त्यामुळे आम्हाला गद्दार म्हणता येणार नाही, असं वक्तव्य देखील शंभुराज देसाई यांनी केलं आहे.
“राष्ट्रवादीची तळी उचलून तुमच्या पक्ष प्रमुखांनी संपूर्ण पक्ष भिकेला लावला”
दरम्यान, दसरा मेळाव्यावरून सध्या राज्यात ठाकरे आणि शिंदे यांच्यात जोरदार लढाई सुरू आहे. शिवाजी पार्क येथील मैदानासाठी दोन्ही बाजूंनी महापालिकेत अर्ज दाखल केले आहेत. परंतु अद्यापही कोणालाही मैदानाची परवानगी देण्यात आली नाही. त्याचबरोबर जर शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे झाला नाहीतर आम्ही सील तोडून आत घुसु असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे.
Read also
- “तर आम्ही उद्धव ठाकरे यांचं स्वागत करू”; खासदार राहुल शेवाळे यांचं वक्तव्य
- “आम्ही ५० जण बाजीगर होतो, त्यामुळे आम्हाला गद्दार म्हणायच्या भानगडीत पडू नका”; शहाजी पाटिल
- पत्राचाळमधील सर्व पैसे राऊतांनी ‘ठाकरे’ चित्रपटात वळवले; इडीचा दावा, राऊत अडचणीत
- “पत्रावाळ चाळ प्रकरणी शरद पवारांची चौकशी व्हावी”, भाजपची मागणी, शरद पवार म्हणाले, “लवकर करा, नाहीतर..:”
- “तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांनीच मुख्यमंत्री व्हायचे काय?” शिंदेंचा सवाल