मुंबई : दसरा मेळाव्यावरून गलिच्छ राजकारण थांबवले पाहिजे. शिवसेनेच्या निर्मितीपासून एक अपवाद वगळता शिवसेनेचा प्रत्येक मेळावा शिवतीर्थावर झाला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्या मेळाव्यातून गरजले, बरसले. देशाला, राज्याला नवी दिशा दिली. मराठी माणसाच्या उत्कर्षासह देशात हिंदुत्वाचा पुकार केला. त्यांनी हिंदुत्व अंगीकारले, त्याचे त्यांना शासन देखील भोगावे लागले. शिवसेना आणि शिवतीर्थाचे अतुट नाते आहे, ते कुणालाही तोडता येणार नाही. ही पंरपरा असून त्यात आडवे येण्याची गरज काय ? असा सवाल शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.
मराठा आरक्षण समितीचा 30 दिवसांचा अल्टिमेटम..! राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
त्यावरून मनसेचे नेते गजानन काळे यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, विनायक राऊत राष्ट्रवादीची तळी उचलून तुमच्या पक्ष प्रमुखांनी संपूर्ण पक्ष भिकेला लावला आहे. नावाला शिल्लक असलेल्या पक्षाची इतकी वाईट अवस्था झाली आहे, की जिथे जिथे छोटे नवाब यांची निष्ठा यात्रा होते तिथले पक्षाचे पदाधिकारी दुसऱ्या दिवशी शिंदेंच्या सेनेत प्रवेश करत आहेत.
वेदांत प्रकल्प गुजरातला गेला..! शिंदे ॲक्शन मोडमध्ये, दिल्ली दौरा वादळी ठरणार ?
मुंबई महानगर पालिकेत सेटिंग करून आतापर्यंत काय काय उद्योग केलेत आणि राज्यात सत्ता असताना काय लफडी केलीत हे सचिन वाजेच्या आणि पत्रा चाळीच्या प्रकरणातून महाराष्ट्राला कळले आहे. “मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली” अशी तुमची गत झाली आहे. असा टोला देखील त्यांनी हाणला आहे.
तर मी महाराष्ट्राच्या विधानसभेत आत्महत्या करेन..! सेनेच्या आमदाराचं शिंदेंना इशारा
मुंबई मनपा व राज्य सरकारने शिल्लक सेनेला शिवतीर्थावर टोमणे मेळावा साठी परवानगी देऊन टाकावी आणि खंजीर, मर्द, मावळा, वाघनखं, गद्दार, निष्ठा यातून होणाऱ्या मनोरंजनापासून महाराष्ट्राला वंचित ठेऊ नये. तसेचही यावेळची स्क्रिप्ट बारामतीवरून येणार आहे. अबू आझमी व ओवेसी स्टेजवर असणार आहेत का ? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
Read also
- संजय राऊतांसोबत आता शरद पवारांची देखील पत्राचाळ प्रकरणी चौकशी करा; भाजप आमदाराची मागणी
- गुजरातला उद्योगाचा पेटारा , महाराष्ट्राला बेरोजगारीचा कटोरा ” “गुजरात तुपाशी , महाराष्ट्र उपाशी”
- “एसटी महामंडळाला निधी देताना हात आखडते का घेत आहेत?” रोहित पवारांचा सवाल
- “मायबाप जनतेला वाऱ्यावर सोडणं कितपत योग्य? खोके सरकारने याचं आत्मचिंतन करावं”; सुप्रिया सुळे
- “आमचा दसरा मेळावा हिंदुत्वाच्या विचारांचा, त्यांचा शरद पवार अन् सोनिया गांधीच्या विचारांचा”; गुलाबराव पाटील