मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन खुप गाजलं होतं. त्यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घरावर हल्ला केल्याने वकील गुणरत्ने सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर या आंदोलनावरून राज्यात अनेक गोष्टी घडल्या होत्या. आता त्यातच आता अशातच आता एसटी महामंडळाने मागील 2 महिन्यांपासून 90 हजार कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीचा हफ्ताच जमा केला नाही. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
“तिघाडी सरकारचा पुण्यात सुफडा साफ झाला..! तीन तिघाडा, काम बिघाडा”; रूपाली पाटील
एसटी आंदोलनाच्या वेळी कर्मचाऱ्यांबाबत कळवळा दाखवणारे नेते आज स्वत: सत्तेत असतानाही एसटी महामंडळाला निधी देताना हात आखडते का घेत आहेत? तेव्हा राजकीय फायद्यासाठी भूमिका घेतल्या. आता सत्तेत असताना एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठीही न्याय भूमिका घ्यावी. असा इशारा देखील त्यांनी घेतला आहे.
तसेच महाविकास आघाडी सरकारने कोरोनामुळं राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असतानाही महामंडळाला वेळोवेळी मदत दिली. नियमित वेतनाची हमी घेत वेतनात 41 टक्के वाढ केली. सत्ताधाऱ्यांनी आपल्या भूतकाळातील भूमिकांचं स्मरण करून महामंडळास भरघोस निधी द्यावा. असा निशाणा देखील त्यांनी साधला आहे.
“दसरा मेळाव्याची स्क्रिप्ट बारामतीवरून येणार, अबु आझमी व ओवेसी स्टेजवर असणार का?” मनसेचा खोचक सवाल
एसटी महामंडळाचे प्रती महिना 450 कोटी रूपये उत्पन्न तर खर्च प्रती महिना 650 कोटी रूपये आहे. एसटी महामंडळ चालवण्यासाठी प्रती महिना पगारासाठी 310 कोटी, डिझेल 250 कोटी तर इतर आस्थापनासाठी 90 कोटी रूपये खर्च होतो. एसटी महामंडळाला सरकारकडून 360 कोटी ऐवजी आता केवळ 100 कोटी रूपये निधी मिळत असल्याने उर्वरित 200 कोटी रूपये आणायचे कुठून असा महामंडळासमोर प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना ऐनदिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. त्यानंतर राज्यात अनेक गोष्टी घडल्या होत्या. त्यावर उपाय म्हणून सरकारने काही निधी महामंडळांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता पुन्हा एकदा ऐनदिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांवर अशी वेळ आली आहे.
Read also
- “मायबाप जनतेला वाऱ्यावर सोडणं कितपत योग्य? खोके सरकारने याचं आत्मचिंतन करावं”; सुप्रिया सुळे
- “आमचा दसरा मेळावा हिंदुत्वाच्या विचारांचा, त्यांचा शरद पवार अन् सोनिया गांधीच्या विचारांचा”; गुलाबराव पाटील
- मराठा आरक्षण समितीचा 30 दिवसांचा अल्टिमेटम..! राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- वेदांत प्रकल्प गुजरातला गेला..! शिंदे ॲक्शन मोडमध्ये, दिल्ली दौरा वादळी ठरणार ?
- तर मी महाराष्ट्राच्या विधानसभेत आत्महत्या करेन..! सेनेच्या आमदाराचं शिंदेंना इशारा