मुंबई : वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्यात विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर आरोपांची राळ उडवली आहे. यातच सगळ्याच क्षेत्रातून एकनाथ शिंदेंवर टिका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौरा करणार आहे. दिल्ली दौऱ्यात ते राज्यातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याची शक्यता आहे. त्याच्या हालचाली देखील सुरू झाल्या आहेत.
“राहुल गांधींनाच काॅंग्रेसचा अध्यक्ष बनवा”; महाराष्ट्र काँग्रेसच्या बैठकीत ठराव मंजूर
एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अश्विनी वैष्णव यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा चर्चेचा विषय ठरणार आहे. वेदांता प्रकल्पाबाबत एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोनवरून संवाद साधला होता. त्यावेळी वेदांत पेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देणार असल्याचं मोदींनी सांगितलं आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं.
“शिवाजी पार्क सील केलं तर ते तोडून टाकू;” परवानगी नाकारल्याने चंद्रकांत खैरे आक्रमक
मुख्यमंत्री झाल्यानंतर वेदांताचे मालक अनिल अग्रवाल, फॉक्सकॉन आणि केपीएमजी यांच्यासोबत एक बैठक घेतली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. यावेळी सरकारकडून ज्या काही सवलती देणे शक्य आहे. त्या सर्व दिल्या जातील. तळेगावजवळील 1100 एकर जमीनही आम्ही देऊ केली होती. 30 ते 35 हजार कोटींची सवलतीसह सब्सिडी, अन्य बाबी सरकारच्यावतीने ऑफर करण्यात आल्या होत्या. अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
एसटी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संक्रात..! रूपाली पाटील म्हणाल्या, “कुठे आहे रे कडकनाथा?”
दरम्यान, वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याने विरोधी पक्षनेते अजित पवारांनी राज्य सरकारवर सडकून टिका केली होती. तसेच आदित्य ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला होता. त्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.
Read also
- तर मी महाराष्ट्राच्या विधानसभेत आत्महत्या करेन..! सेनेच्या आमदाराचं शिंदेंना इशारा
- “तिघाडी सरकारचा पुण्यात सुफडा साफ झाला..! तीन तिघाडा, काम बिघाडा”; रूपाली पाटील
- राऊतांचा खासदार म्हणून महिन्याला 1 लाख 85 हजार अन् सामनात 1 लाख पगार..! इडीने जाहीर केलं राऊतांचं आरोपपत्र
- “दसरा मेळाव्याची स्क्रिप्ट बारामतीवरून येणार, अबु आझमी व ओवेसी स्टेजवर असणार का?” मनसेचा खोचक सवाल
- “आज रामदास कदमांचं खरं रूप समोर आलं, उद्या सगळ्याच बंडखोर आमदारांचं रूप समोर येईल”