पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्यामुळे यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट या दोन्ही बाजूंनी आम्हीच शिवाजी पार्क येथील मैदानावर दसरा मेळावा घेणार असल्याचा दावा करीत आहेत. दोन्ही बाजूंनी मैदानाच्या परवानगीसाठी महापालिकेत अर्ज केले आहेत. परंतु अद्यापही कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आम्ही जेव्हा शिवसेनेच्या विरोधात होतो, तेव्हा शिवसेनेच्या बाबती असं कधीही केलं नाही. शिवसेनेचा भव्य मेळावा व्हायचा. आम्हीही तो उत्सुकतेनं पहायचो. आमच्यावरती काय टिका करतात याची आम्हाला उत्सुकता असायची. बाळासाहेब ठाकरे शिवाजी पार्कवरून शरद पवारांवर टीका करायचे यातच तर गम्मत आहे. विरोधक हा दिलदार असायला हवा. नाहीतर राजकारण आणि समाजकारण करायला मज्जा कशी येणार ? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
“दसरा मेळाव्याची स्क्रिप्ट बारामतीवरून येणार, अबु आझमी व ओवेसी स्टेजवर असणार का?” मनसेचा खोचक सवाल
मायबाप जनतेला वाऱ्यावर सोडणं कितपत योग्य याचं आत्मचिंतन ओरबाडून आलेल्या खोके सरकारने करावं. महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार पालकमंत्री असताना पुण्यात दर आठवड्यात आढावा बैठक व्हायची. पण आता, सत्ताधारी तसं काहीच करत नाहीत. त्यामुळे विकास कामं थांबली आहे. तसेच 23 गावातील कचरा आणि पाणी समस्या अजूनही तशीच आहे. प्रशासक आणि शहाराला पालकमंत्री नसल्याने अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. म्हणूनच खासदार या नात्याने पुणे मनपा आयुक्तांची भेट घेऊन या प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेतल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
“आज रामदास कदमांचं खरं रूप समोर आलं, उद्या सगळ्याच बंडखोर आमदारांचं रूप समोर येईल”
दरम्यान, दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क येथील मैदानासाठी दोन्ही बांजूनी अर्ज सादर करण्यात आले आहेत. परंतु महापालिका आयुक्तांवर दोन्ही बाजूंनी दबाव असल्याचं बोलण्यात येत आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी यासंदर्भातील प्रकरण हे विधी विभागाकडे पाठवलं आहे. आता त्यावर काय निर्णय होतोय. ते देखील पाहणं महत्वाचं आहे. अशातच दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेने बीकेसीतील मैदानासाठी अर्ज केला होता. तो मैदान अगोदर एका खासगी कंपनी बुक केल्याने उद्धव ठाकरेंना त्या मैदानाची परवानगी नाकारण्यात आली आहे.
Read also
- “आमचा दसरा मेळावा हिंदुत्वाच्या विचारांचा, त्यांचा शरद पवार अन् सोनिया गांधीच्या विचारांचा”; गुलाबराव पाटील
- मराठा आरक्षण समितीचा 30 दिवसांचा अल्टिमेटम..! राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- वेदांत प्रकल्प गुजरातला गेला..! शिंदे ॲक्शन मोडमध्ये, दिल्ली दौरा वादळी ठरणार ?
- तर मी महाराष्ट्राच्या विधानसभेत आत्महत्या करेन..! सेनेच्या आमदाराचं शिंदेंना इशारा
- “तिघाडी सरकारचा पुण्यात सुफडा साफ झाला..! तीन तिघाडा, काम बिघाडा”; रूपाली पाटील