मुंबई : काल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पुन्हा एकदा कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी संजय राऊत यांनी कलम 3 नुसार परिभाषित केल्यानुसार 3,27,85,475/- रुपयांच्या गुन्ह्यांमध्ये जाणूनबुजून स्वत: लाँडरिंग केले आहे आणि ते पीएमएलए, 2002 च्या कलम 4 अंतर्गत शिक्षेस पात्र आहेत. संजय राऊत हे प्रविण राऊत यांच्यामार्फत गोरेगाव सिद्धार्थ नगरच्या पुनर्विकासात थेट सहभागी होते. संकल्पनेच्या टप्प्यापासून ते कार्यान्वयित होईपर्यंत त्यांनी प्रकल्पात सहभाग घेतला, असं ईडीने आरोपपत्रात म्हणलं आहे.
वेदांत प्रकल्प गुजरातला गेला..! शिंदे ॲक्शन मोडमध्ये, दिल्ली दौरा वादळी ठरणार ?
यातच आता गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची चौकशी करावी अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी दिली आहे. त्यांनी यासंदर्भात गृहमंत्र्यांना पत्र देखील पाठवलं आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. यातच आता अतुल भातखळकर हे अत्यंत अभ्यासून व्यक्तीमत्व आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांनी शरद पवार यांचा हस्तक्षेप आहे असं त्यांनी पत्र लिहून म्हटलं आहे. तर त्यांच्याकडे काही बाबी किंवा पुरावे असतील म्हणूनच त्यांनी गृहमंत्र्यांकडे ही विनंती केली आहे. तर गृहमंत्री आणि सरकार त्याची चौकशी करतील असं मला वाटतं असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
तर मी महाराष्ट्राच्या विधानसभेत आत्महत्या करेन..! सेनेच्या आमदाराचं शिंदेंना इशारा
2006-07 साली संजय राऊत यांनी तत्कालिन केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पत्रा चाळ पुनर्विकासासाठी म्हाडा अधिकारी आणि इतरांसह बैठकांना आणि माजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील दुसऱ्या बैठकीला हजेरी लावली होती. त्यानंतर राकेश वाधवान यांनी मेसर्स गुरूआशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडमार्फत पत्रा चाळ पुनर्विकास करण्यासाठी आणले, असा दावाही ईडीने केला आहे.
“तिघाडी सरकारचा पुण्यात सुफडा साफ झाला..! तीन तिघाडा, काम बिघाडा”; रूपाली पाटील
प्रकल्पावर नियंत्रण ठेवण्यासाठी संजय राऊत यांनी प्रविण राऊत यांना त्यांचे प्रॉक्सी आणि विश्वासपात्र म्हणून समाविष्ट केलं. मनी ट्रेलच्या तपासात प्रविण राऊत या संजय राऊत यांच्या प्रॉक्सीने एचडीआयएलकडून त्याच्या बँक खात्यात 112 कोटी रुपये प्राप्त केले. पुढे हे पैसे मालमत्ता संपादन करणे, त्याच्या व्यावसायिक संस्था, कुटुंबातील सदस्यांच्या खात्यात वळवणे इत्यादींमध्ये हस्तांतरित केले.
Read also
- गुजरातला उद्योगाचा पेटारा , महाराष्ट्राला बेरोजगारीचा कटोरा ” “गुजरात तुपाशी , महाराष्ट्र उपाशी”
- “एसटी महामंडळाला निधी देताना हात आखडते का घेत आहेत?” रोहित पवारांचा सवाल
- “मायबाप जनतेला वाऱ्यावर सोडणं कितपत योग्य? खोके सरकारने याचं आत्मचिंतन करावं”; सुप्रिया सुळे
- “आमचा दसरा मेळावा हिंदुत्वाच्या विचारांचा, त्यांचा शरद पवार अन् सोनिया गांधीच्या विचारांचा”; गुलाबराव पाटील
- मराठा आरक्षण समितीचा 30 दिवसांचा अल्टिमेटम..! राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय