मुंबई : 1977 साली पहिल्या महिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सारख्या जबरदस्त लोकप्रिय नेतृत्व असतानाही संसदीय लोकशाहीला बाजूला ठेवण्याची भूमिका त्यावेळी जनतेने घेतली. संसदीय लोकशाही पद्धत दुबळी करणे हे आम्ही मान्य करणार नाही हे लोकांनी दाखवून दिली. त्यानंतर ज्यांच्या हाती सत्ता दिली त्यांना कारभार जमत नाही हे जेव्हा जनतेच्या लक्षात आले, तेव्हा पुन्हा एकदा त्यांच्या हातून जनतेने सत्ता इंदिरा गांधी यांच्या हाती दिली. लोक शहाणपणाचे निकाल घेत असतात. असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.
हेही वाचा…“…तोपर्यंत जनतेची फसवणूक थांबणार नाही”, अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
पुढे बोलतांना ते म्हणाले की, देशात आजचे चित्र पाहिले तर केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, झारखंड, हिमाचल प्रदेश, दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल येथे भाजपचे राज्य नाही. त्यामुळे बहुसंख्य राज्यात लोकांनी शहाणपणाचा निकाल घेतला आहे. संस्थांवर हल्ला करणारे राज्यकर्ते आम्हाला नको असा लोकांना विश्वासदर्शक पर्यात देण्यात यशस्वी झाले तर लोक निश्चित वेगळा विचार करतील. पण यात आम्ही शहाणपणाने वागलो नाही तर कदाचित लोक पर्याय म्हणून दुसरा विचार करणार नाहीतच असे म्हणता येणार नाही. त्यामुळे एकंदरीत चित्र काळजी करण्यासारखे आहे. असंही शरद पवार म्हणाले.
हेही वाचा…भीमा कोरेगाव दंगलीप्रकरणी फडणवीसांचा चौकशी करा, आंबडेकरांची मागणी, फडणवीस म्हणाले, आमचं सरकार…
दरम्यान, देशात मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाविषयी चिंता वाटावी असे चित्र आहे. देशातील अनेक राज्यात ख्रिश्चन समाजाच्या प्रार्थनास्थळांवर हल्ले होत आहेत. ख्रिश्चन समाज हा अत्यंत शांत प्रवृत्तीचा असा आहे. तरी कुठेतरी एखाद्या व्यक्तीने आपला व्यक्तीगत धर्म बदलण्याचा निर्णय घेतला तर संपूर्ण समाजावर आणि प्रार्थनास्थळांवर हल्ले होतात. मुस्लिम समाजात दारिद्र्य, मागासलेपणा, कमतरता निश्चित आहे. समाज एकसंध करायचा असेल, विकासाच्या रस्त्यावर न्यायचा असेल तर एखादा घटक मागे ठेवून समाज कधी पुढे जाऊ शकणार नाही. मुस्लिम समाजाकडे पाहण्याचा सामान्य लोकांचा दृष्टीकोन जरी अनुकूल असला तरी काही लोक यात जाणीवपूर्वक कटुता कशी येईल याची काळजी घेतात. हे मोठे आव्हान देशात दिसते. असंही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“पडळकराचं गाढवासारखं झालंय, आमदार झालं तरी सुधारत नाही”, राष्ट्रवादीचा खोचक टोला
हेही वाचा…भाजप खासदाराने ‘द केरला स्टोरी’ पाहण्यासाठी मुलीला थेटरात नेणे, दुसऱ्याच दिवशी मुलगी मुस्लिम प्रियकरासोबत फरार
हेही वाचा…शिंदे सरकारमध्ये मोठा काळाबाजार, अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे रेट सांगत अजित पवारांचा सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा…“फडणवीसांना कोरेगाव दंगली प्रकरणी साक्ष देण्यासाठी विटनेस बॉक्समध्ये बोलवा”, आंबेडकरांच्या मागणीने खळबळ
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या बडा नेत्याची एंन्ट्री तेलंगणाच्या पक्षात, पक्ष प्रवेश घेण्यासाठी पाठवलं खास विमान महाराष्ट्रात