मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंडाळी केल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. काल अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ३० आमदारांनी शरद पवारांची भेट घेतली मात्र त्यावर कोणतीही प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली नाही. परंतु आज राष्ट्रवादीच्या तब्बल २१ पदाधिकाऱ्यांना शरद पवार गटाने घरचा रस्ता दाखविला आहे.
हेही वाचा…“राज्याचं विरोधी पक्षनेते पद काॅंग्रेसच्या तरूणाकडे द्या,” राष्ट्रवादीच्या आमदाराची मागणी
महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी २ जुलै २०२३ रोजी विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहिले. या सर्वांचे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी आहे.त्यामुळे त्यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून व संघनेतील पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात येत असल्याचं राष्ट्रवादीने म्हटलं आहे.
हेही वाचा…“किरीट सोमय्या, नागडा तर तु झाला आहेस, सभागृहात पेन ड्राईव्ह देणार,” ‘या’ नेत्याना दिला इशारा
राष्ट्रवादीने पक्षातून निलंबित केलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये रत्नागिरीचे जिल्ह्याध्यक्ष बाबाजी जाधव, वसई-विरार जिल्ह्याध्यक्ष राजाराम मुळीक, तसेच पिंपरी चिंचवड शहाराध्यक्ष अजित गव्हाणे, प्रशांत कृष्णाराव शितळे, राहुल हनुमंत भोसले, जगदीश शंकर शेट्टी, तसेच लोकसभा दिंडोरीचे रविंद्र पगार यांच्यासह राष्ट्रवादीच्या २१ पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीने घरचा रस्ता दाखवला आहे.
महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री/मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी २ जुलै २०२३ रोजी पुढील यादीनुसार विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहिले. या सर्वांचे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी… pic.twitter.com/Q22dnV5twh
— NCP (@NCPspeaks) July 18, 2023
READ ALSO :
हेही वाचा…” ही सेक्स खंडणी आहे का ? व्हिडीओच्या त्या बाजूला कोण होतं? सगळ्याची चौकशी करा,” अनिल परबांची मागणी
हेही वाचा…मोदींच्या विरोधात विरोधक एकजुटले, आघाडीचं नाव ठरलं, विरोधकांनी दिलं ‘हे’ नाव
हेही वाचा…सोमय्यांचा विषय सभागृहात गाजला, ठाकरेंच्या वाघांनी थेट हल्लाच केला, दानवेंनी थेट पेन ड्राईव्ह दिला
हेही वाचा…“सोमयांचा व्हिडीओ आत्ताच का यावा ? भाजपने किरीट सोमय्यांचा बळी दिला”
हेही वाचा…“हवं तर यांना मंत्री करा, बच्चू कडूंनी मंत्रिपदाचा दावा सोडला”, मुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर जाहीर केली भूमिका