पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम वेळेत भाजपने राष्ट्रवादीला कोंडीत पकडलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत काॅंग्रेसचे माजी नगरसेवक उस्मान हिरोली यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरून कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेतून निशाणा साधला. त्यानंतर भाजपच्या इतर नेत्यांनीही त्यांच्यावर टिकास्त्र सोडलं. त्यावर आता शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…राणेंना बाईनं पाडलं, अजित पवारांची टोलेबाजी, त्यात राऊतांनीही तेल ओतलं, म्हणाले, कमाल की चीज..
मतदार कुठे गेले असतील तर त्यांनी निवडणुकीसाठी यावे, असे आवाहन करण्यात चुकीचे नाही. जर मतदार नसेल तर त्यासंबंधी हकरत घेणे योग्य आहे. एखाद्याच्या भाषणावर हरकत घेणे म्हणजे कळत-नकळतपणे त्याला जातीय रंग देण्याचा हा प्रयत्न आहे. ज्यावेळी यशासंबंधी शंका तयार होते, तेव्हा जात, पात, धर्म या चुकीच्या गोष्टींकडे आपला प्रचार वळवण्याचे काम भाजपसाठी नवे नाही. यापुर्वीही असे अनेकदा झाले आहे. कसब्यामध्ये मिळालेली माहिती जरी अधिकृत नसली तरी, या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून जे अर्थकारण होतंय. ते यापुर्वी आम्ही कधी बघितले नाही असे लोक सांगतात. याचा अर्छ कोणत्याही टोकाला जाऊन ही निवडणूक हातात घ्यावी, असे चित्र असावे. असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“काँग्रेसने एलबीटी कर आणला, तो फडणवीसांनी बंद केला”, कसब्यात चंद्रकांत पाटलांचा घणाघात
पुढे बोलतांना ते म्हणाले की, भाजपमधले सगळेच लोक आवडण्यासारखे आहेत असे मला वाटत नाही. इतकी वर्षे मी भाजपवाल्यांना बघत आहे, त्यांना युतीत यावे असे वाटत नाही. त्यामुळे माझ्याबाबत होणारी विधाने ही अतिशय पोरकट आहेत. सरकार चालवून लोकांना विश्वास देणे आणि विकासाच्या कामाला गती देणे, असे कोणतेही काम सरकारकडून होत नसल्यामुळे इतर गोष्टींकडे लक्ष वेधण्यासाठी विविध विषय काढले जातात. असंही ते म्हणाले.
हेही वाचा…“पोटनिवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार”, रासनेंसाठीचा मुख्यमंत्र्यांचा ‘रोड शो’ गेमचेंजर ठरणार का ?
दरम्यान, कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी अल्पसंख्यांकाचा मेळावा पार पडला. त्या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पराभूत करण्यासाठी दुबईवरून लोक आणा, सौदीवरून लोक आणा, मेलेले आहेत, त्यांना हजर करा. असं वक्तव्य काॅंग्रसेचे माजी नगरसेवक उस्मान हिरोली यांनी केलं होतं. त्यावेळी त्या कार्यक्रमात शरद पवार देखील उपस्थित होते. त्यावरून भाजपने राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय.
Read also
- “निष्ठा काय असते ते मुक्ताताई टिळक आणि गिरीश बापट यांनी दाखवून दिले”, एकनाथ शिंदे
- हेही वाचा…“निवडणुक आयोग काय लोकसेवा आयोग काय, रिझल्टला महत्व,” शिंदेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर
- हेही वाचा…“कसब्याची जागा नुसती जिंकून उपयोगाची नाही, तर मोठ्या मताधिक्याने जिंकायचीय,” चंद्रकांत पाटील
- हेही वाचा…दिल्ली, पंजाबचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेटीला, मोदीविरोधात आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली
- हेही वाचा..““भाजपचे आक्रस्ताळे नेते फडणवीस आणि चित्रा वाघांसारखे वाचाळ कार्यकर्ते धर्माच्या नावाने पळापळ करताय”