नाशिक : भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला आता दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा शरद पवारांच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे माजी खासदार हरिचंद्र चव्हाण यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा…“सुळे, सुनेत्रा पवार अन् शिवतारेंसह मैदानात, बारामतीच्या रिंगणात आणखी एक ओबीसी चेहरा उतरणार
सलग तीन वेळा खासदार असलेल्या हरिचंद्र चव्हाण यांचं २०१९ साली तिकीट कापून राष्ट्रवादीतून आलेल्या भारती पवारांना भाजपने तिकीट दिले. यानंतर हरिचंद्र चव्हाण मागील काही वर्षांपासून नाराज आहेत. यातच काल भाजपने पुन्हा एकदा भारती पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर हरिचंद्र चव्हाण यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी शरद पवारांकडून हरिचंद्र चव्हाण यांना उमेदवारी देणार का ? अशीही चर्चा सुरू झालीय.
हेही वाचा…मोठी घोषणा..! तिरंगी लढतीचा फटका अजित पवारांना बारामतीत बसणार ? विजय शिवतारे अपक्ष म्हणून निवडणूक लढणार
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून सध्या शरद पवारांचा उमेदवार मैदानात उतरणार आहे. यातच सध्या महाविकास आघाडीकडून माजी. जि.प. सदस्य भास्कर भगरे निवडणुक लढण्यास इच्छूक आहेत. याच दरम्यान निफाड येथे झालेल्या सभेत त्यांनी तशी इच्छा व्यक्तही करून दाखवली आहे. तर दुसऱ्या बाजूला हरिचंद्र चव्हाण यांनी देखील पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून आता दिंडोरी लोकसभा मतदारंसघातून कुणाला उमेदवारी देणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपसह राष्ट्रवादी शरद पवार गटाचीही ताकद मोठी आहे. यातच मॉर्क्सवादी कमिन्यिस्ट पार्टीचे नेते आणि माजी आमदार जीवा पांडू गावित यांनी देखील महाविकास आघाडीच्या सभेला हजेरी लावली आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत जीवा पांडू गावित यांनी जवळपास एक लाखांच्या वर मतं घेतली होती. त्यामुळे महाविकास आघाडीची ताकद या मतदारसंघात एकजुट झाली तर भारती पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मागच्या निवडणुकीत एबी फॉर्म भरला, पक्षाने तिकीट कापलं” मात्र 2024 साली स्मिता वाघांना निष्ठेचं फळ
हेही वाचा..‘अहमदनगर’ शहराचं नाव बदललं, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
हेही वाचा.*“काल मनसेला जय महाराष्ट्र, आज वसंत मोरेंना ३ मोठ्या पक्षांची ऑफर”, कोणत्या पक्षात जाणार ?*
हेही वाचा…“मित्रपक्षांच्या नेत्यांना ‘स्वाभिमान गहाण टाकला की गुलामी पत्करावीच लागते’” शिंदे अन् अजित पवारांना जोरदार टोला
हेही वाचा..“शांतिगिरी महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर विरोधकांना नक्कीच घाम फुटणार ?” कारण ही आलं समोर