मुंबई : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षांबाबत आज निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला देण्यात आला आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाला याचा मोठा धक्का बसला आहे. यातच शिवसेनेची सध्याची घटना लोकशाही विरोधी असल्याचं निरीक्षण नोंदवत धनुष्यबाण आणि शिवसेना शिंदे गटाला देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे….
देशाच्या स्वातंत्र्याचा ७५ वर्षात आता सरकारची दादागिरी सुरु आहे. पंतप्रधानांनी आता जाहीर करावे लोकशाही नाही बेबंदशाही सुरु आहे. न्याययंत्रणा आपल्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न केला जात आहे. आजचा निकाल अत्यंत अनपेक्षित असून मागील सहा महिने न्यायालयात लढाई सुरु होती, तो पर्यंत निवडणुक आयोगाने निकाल देऊ नये असे बोललो होतो. निवडणुक आयोगाबाबत सांगेल जशी न्यायधीश निवडीची प्रक्रिया तशीच निवडणुक आयुक्तांच्या बाबतीत असायला हवी. जगातल्या मोठ्या पक्षाची स्वतः हून लढण्याची हिंमत नाही. निवडणुका घेण्याचे आव्हान मी केले. आता चिन्ह मिंधे गटाला दिल्यावर आता मनपा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता जास्त आहे. मुंबईवर ताबा मिळवण्याची भाजपची रणनिती असून शिवसेनाप्रमुखांनी पुजलेला धनुष्यबाण आजही माझ्याकडेच असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..“भगतसिंह श्यारी नामक विद्यार्थ्याला तात्काळ शाळेतून कमी करण्यात आले”, राष्ट्रवादीची टिकात्मक पोस्ट
शिवसैनिकांनो खचून जाऊ नका. हिंमत सोडू नका,
१०० कौरव एकत्र आले तरी पांडव जिंकले. महाराष्ट्रातील जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. सर्वोच्च न्यायालयात आम्ही जिंकू अशी अपेक्षा आहे. केंद्रीय मंत्री म्हणाले होते, द्या ब्रेकींग न्यूज. आज धनुष्यबाण ओरबाडून घेतले तरी तुम्हाला मिळणार नाही. चोरी पचली तरी चोर चोरच असतो. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे, तोवर त्यांना पेढे खाऊ द्या. शिवसैनिकांनो खचून जाऊ नका. हिंमत सोडू नका, असे चोर चोरी पचवू शकणार नाही. असा विश्वास देखील ठाकरेंनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा..‘मास्टर ब्लास्टर’ आमदार सुनील शेळके चिंचवडमध्ये ठरणार ‘किंगमेकर’
निवडणुक आयोगाने आज शेण खाल्ले
आम्ही न्यायालयाला विनंती केली होती की निवडणुक आयोग गडबड करणार. आमचा सर्वोच्च न्यायालयावर आमचा नितांत विश्वास असून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या केसवर जगाचे लक्ष आहे. हे सगळे लोकशाही विरोधी कृत्य परकीय गुतंवणूकदार पण बघताहेत. गेले काही दिवस निवडणुक आयोगाचे थोतांड सुरू आहे. आम्ही शपथपत्र, अर्ज लाखोंच्या संख्येने दिलीत तरी निवडणुक आयोगाने आज शेण खाल्ले. हिंदुत्वाचा त्याग केला म्हणजे काय केले? भाजपने पाठीत वार केला म्हणून मी काँग्रेस सोबत गेलो. उद्या त्यांनी नमाज पढले तरी ते हिंदू का? बाळासाहेबांचे विचार गुलामी करण्याचे नाहीत. आम्ही पोटनिवडणुक जिंकलो. महाराष्ट्रात मोदी नाव चालत नाही. आता बाळासाहेब चोरले. तुम्ही पोटनिवडणुक का नाही लढले. लोकशाही सक्षम व्हावी तर सर्वच क्षेत्रांनी एकत्र यायलाच हवे. आज माध्यमांवर पण धाडी पडताहेत. महाराष्ट्रात आज दोन पोटनिवडणुका सुरु आहेत. तेव्हाच निवडणुक आयोगाने निकाल दिला. ते म्हणतात काँग्रेसने तेव्हा तसेच केले, पण म्हणूनच लोकांनी तुम्हाला निवडून दिले. असंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..चंद्रकांतदादांनी घेतली बाळासाहेब दाभेकारांची भेट; मविआची डोकेदुखी वाढणार ?
निवडणुकांसाठीच निवडणुक आयोगाने ठरवून निकाल दिला
पुढे बोलतांना ते म्हणाले, की देशाचे न्यायालय ही शेवटची आशा आहे. निवडणुक आयुक्तांच्या विरोधात प्रशांत भू़षण यांनी केस दाखल केलीय. पंतप्रधानांनी दखल घेतली असती तर लोकशाही विरोधात कृत्य झाले नसते. शिवसेना आता जोमाने पुढे येणारच. अंधेरी पोटनिवडणुक झाली तेव्हा पण धनुष्यबाण नव्हते. पण अगोदरपेक्षा आम्हाला अधिक मते. उद्या कदाचित आम्हाला दिलेली मशाल पण काढून घेतील. ह्याची नोंद ठेवा. आपण लोकशाही संपतांना आपण गुपचूप बसणार आहोत का? इंदिरा गांधींना पण जनतेने नाकारले होते आणीबाणी लावली म्हणून. यांनी कागदावर धनुष्यबाण चोरलाय. आता भाजप बाळासाहेबांचा चेहरा लावून निवडणुका जिंकायच्या आहे. पाच न्यायमूर्ती निकाल देणार असतील तर आमचा आक्षेप नाहीच. ते निष्पक्षपणे सुनावणी घेताहेत. जे शिवसैनिक भेटतात त्यांना मी हेच सांगितले आपण १९६६ सालात आहोत. आपण देण्याचे काम केले. निवडणुकांसाठीच निवडणुक आयोगाने ठरवून निकाल दिला. ज्यांनी गद्दारांना नेता बनवले ते माझ्यासोबतच. निवडणुक प्रक्रिया कशी पार पडली त्याच्या सीडी इत्यादी सगळच निवडणुक आयोगाला दिले. सदस्य संख्या, पदाधिकारी आमच्या बाजूने आम्ही त्यांना भारी पडले. आम्ही निवडणुक आयोगाला घरची रद्दी नाही दिली. ज्या पद्धतीने हलकटपणा सुरु आहे तसे कदाचित ते मशाल पण काढून घेऊ शकतात. आज तुमच्या माध्यमातून तातडीने मी शिवसैनिक आणि जनतेसमोर आलो. असंही ते म्हणाले.
Read also
- हेही वाचा..““विकास आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसे महायुतीच्या पाठीशी ठाम”, रविंद्र चव्हाण यांनी घेतली मनसेच्या नेत्यांची भेट
- हेही वाचा..‘शिवसेना, धनुष्यबाण शिंदे गटाला मिळताच, राजकीय गणितं बदलली, 2024 ला शिंदे पुन्हा मुख्यमंत्रीपदी?
- हेही वाचा..“शिवसेना अन् धनुष्यबाण शिंदे गटाला, निवडणुक आयोगाचा मोठा निर्णय
- हेही वाचा..‘“मुक्ताताईंएवढचं प्रेम हेमंत रासने यांनाही मिळेल, याची खात्री”, चंद्रकांत पाटील
- हेही वाचा…“मुक्ताताईंएवढचं प्रेम हेमंत रासने यांनाही मिळेल, याची खात्री”, चंद्रकांत पाटील