सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेना या तीनही पक्षांनी महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याचे सोमवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीत निश्चित केले. राष्ट्रवादीला ११, कॉंग्रेसला ८ आणि शिवसेनेला दोन जागा देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. परंतू शिवसेना चार जागांवर अडून बसली आहे. त्यामुळे वरिष्ठ नेते मंडळींच्या चर्चेनंतर अर्ज माघारीपूर्वी दोन दिवस अगोदर अंतिम निर्णय होणार आहे.
भाजपच्या जनआक्रोश मोर्चात नियमांची ऐशीतैशी; गिरीष महाजन, रक्षा खडसेंसह आमदार-खासदारांवर गुन्हा दाखल
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गेले काही दिवस राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना नेते तसेच जिल्हाध्यक्षांमध्ये जागा वाटपांवरून चर्चा सुरू आहे. सोमवारी देखील रात्री उशिरा काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेची बैठक सांगलीत झाली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील, कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आमदार अनिल बाबर, आमदार विक्रम सावंत, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील, अविनाश पाटील, अॅड बाबासाहेब मुळीक, देवराज पाटील, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.
सरकार अस्थिर करण्यासाठीच चौकशा लावल्या जाताय आहेत – धनंजय मुंडे
बैठकीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राज्याप्रमाणे भाजपला दूर ठेवून महाविकास आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पालकमंत्री जयंत पाटील यांनी जागा वाटपाचा फॉर्म्युला मांडला. त्यामुळे राष्ट्रवादीला ११, काँग्रेसला आठ आणि शिवसेनेला दोन जागा देण्याचा प्रस्ताव मांडला. स्वीकृतची एक जागा राष्ट्रवादीकडे राहील. स्वीकृतमध्ये ज्या पक्षाला जागा हवी आहे, त्यांना त्यांच्यातील एक जागा सोडावी लागेल, असेही स्पष्ट केले. बैठकीतील चर्चेनुसार बँकेत सोसायटी गटातील दहा जागांपैकी वाळवा, शिराळा, तासगाव व कवठेमहांकाळ जागेवर राष्ट्रवादीने दावा केला आहे. कडेगाव, पलूस, जत व मिरज कॉंग्रेसच्या वाट्याला येतील. तर खानापूर व आटपाडीची जागा शिवसेनेला दिली जाईल. महिला राखीव, नागरी बँका, इतर संस्था गटातील प्रत्येकी दोन जागा कॉंग्रेस व राष्ट्रवादीला प्रत्येकी एकेक मिळतील. अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय, कृषी पणन गटातील जागा राष्ट्रवादीला मिळेल. तसेच इतर शेती संस्था गटातील जागा कॉंग्रेसच्या वाट्याला येईल.
Read Also :
- ED, IT भाजपच्या खिशात असेल, पण लोकशाही नाही हे सिद्ध झालं – रोहित पवार
- सोमय्यांनी खोटे आरोप करणे बंद करावे, माफी मागावी अन्यथा मानहानीचा दावा ठोकणार – काँग्रेस
- प्रतिक काळेच्या आत्महत्येला मंत्री गडाख जबाबदार, पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न – केशव उपाध्येय
- हॉटेल ‘The Lalit’ मध्ये काय गुपित दडलंय? नवाब मलिक रविवारी करणार मोठा गोप्यस्फोट
- 100 कोटी वसुली गुन्ह्यातील कमाईचे मुख्य लाभार्थी अनिल देशमुखचं; ईडीचा कोर्टात दावा