श्रीपूर : देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या जितेश अंतापूरकर हे मोठ्या मतांनी विजयी झाले. हा लोकशाहीचा, लोकांचा आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या प्रयत्नांचा विजय आहे असे आमदार रोहित पवार यांनी महाळुंग श्रीपूर येथे नमूद केले. महाळुंग- श्रीपूर येथे आयोजिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात आमदार रोहित पवार बोलत होते. यावेळी पवार यांनी उपस्थितांना महाळुंग-श्रीपूरच्या नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला पाहिजे असे आवाहन केले.
भाऊबीजेची ओवाळणी म्हणून अजित दादांकडे गॅस सिलेंडरच मागणार – सुप्रिया सुळे
आमदार रोहित पवार म्हणाले ईडी ED, आयकर खाते Income tax, सीबीआय CBI या सर्व केंद्रीय यंत्रणा भाजपच्या खिशात असल्या तरी लोकशाही नाही हे नांदेड आणि दादर नगर हवेलीतील जनेतेून दाखवून दिले. त्यामुळे दपडशाही चालत नाही आणि त्यांना लोकशाहीला ‘खिशात’ घालता येणार नाही हे स्पष्ट झाले आहे. शेवटी मतदार हाच सार्वभौम आहे, हे या निकालाने सिद्ध झाले.
भाजपच्या जनआक्रोश मोर्चात नियमांची ऐशीतैशी; गिरीष महाजन, रक्षा खडसेंसह आमदार-खासदारांवर गुन्हा दाखल
सोलापूरात पदवीधर मतदारसंघात चार उमेदवार महाविकासचे निवडून आले. यंदा नांदेडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार हे दुप्पट मताधिक्याने निवडून आलेत. ही लोकशाहीची ताकद आहे. या परिसरात देखील लोकशाही टिकावी यासाठी प्रयत्न करा असे पवार यांनी आवाहन केले. कोणी काय करीत आहे. कोण आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे याकडे लक्ष देऊन त्यास तोडीस तोड उत्तर देण्यासाठी नगरपंचायत निवडणुकीत युवा पिढीने उत्तर द्यायला हवे. युवा पिढीने येथील १७ म्हणजेच सर्वच्या सर्व जागा निवडून आणायच्या आहेत. तसं मला वचन द्या. पुर्वीचे दिवस राहिलेले नाही याचा अंदाज सर्वांना आहे. त्यामुळे युवा पिढीस ज्येष्ठांनी मार्गदर्शन करावे असे आवाहन केले.
Read Also :
- सोमय्यांनी खोटे आरोप करणे बंद करावे, माफी मागावी अन्यथा मानहानीचा दावा ठोकणार – काँग्रेस
- प्रतिक काळेच्या आत्महत्येला मंत्री गडाख जबाबदार, पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न – केशव उपाध्येय
- हॉटेल ‘The Lalit’ मध्ये काय गुपित दडलंय? नवाब मलिक रविवारी करणार मोठा गोप्यस्फोट
- 100 कोटी वसुली गुन्ह्यातील कमाईचे मुख्य लाभार्थी अनिल देशमुखचं; ईडीचा कोर्टात दावा
- सरकार अस्थिर करण्यासाठीच चौकशा लावल्या जाताय आहेत – धनंजय मुंडे