मुंबई : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणा ईडीचा ससेमिरा मागे लागल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या मैदानात लेटरबॉम्ब टाकला आहे. यामुळे आगामी काळात महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ होण्याचे सूतोवाच केले जात असून, त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, शिवसेना कमकुवत करत असल्याचा खळबळजनक दावा केला असून, भाजपसोबत जुळवून घेण्याचा सल्ला, त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
हे पण वाचा, मोदीं विरोधात ‘राष्ट्रमंच’च्या बॅनरखाली एकवटणार विरोधी पक्ष? पवारांनी उद्या बोलावली १५ पक्षांची बैठक
यांनतर, भाजप नेत्यांकडून एक एक प्रतिक्रिया बाहेर येत असून, भाजप खासदार गिरीश बापट यांनी, “हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजप युती होऊ शकते, आता शिवसेनेनं हा निर्णय घ्यायचा आहे,” असं मत मांडलं आहे. यांनतर आता, “प्रताप सरनाईक म्हणतात ते खरं आहे, पण त्यांच्या म्हणण्याने काही बदलत नाही, हे परिवर्तन उद्धवजींना वाटल्यानंतरच शक्य आहे, आणि त्यांना स्वतःला जेव्हा वाटेल, की आता आघडीमध्ये असह्य झालं आहे आणि रोज उठून हिंदुत्वाशी तडजोड करावी लागत आहे, तेव्हा त्यांच्या मनात कदाचित हे येऊ शकतं. मात्र, आत्ता त्यांच्या डोक्यात काय चाललंय, हे माहीत असेल तर ते केवळ रश्मी वहिनींना,” असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं आहे.
हे पण वाचा, पाच वर्ष सरकार भक्कम; आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – नाना पटोले
तसेच, ज्या दिवशी उद्धवजींनी, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना, ज्यांनी आयुष्यभर दोष दिला, शिव्या घातल्या, खड्डा समजून सारखं दूर ठेवलं, त्यांनाच बरोबर घेऊन सरकार स्थापन केलं. तेव्हापासूनच ही खदखद धुमसत होती. मात्र, शिवसेनेत एक शिस्त आहे, जे सांगायचं आहे ते पक्षप्रमुखांना सांगतील, बाहेर येऊन प्रेससमोर जाहीर मांडणार नाहीत. पण, शेवटी त्यालाही अंत असतो, त्यामुळेच सरनाईक यांनी एक खासगी पत्र लिहिलं, मात्र ते लीक झालं, याचा अर्थ आता आमदारांच्या मनातली खदखद तुम्हाला, बाहेर ऑन पेपर आणायची आहे आणि सर्व आमदारांच्या मनातल्या भावनेला मान देऊन, परिवर्तनाचं बॅकग्राऊंड तयार करायचं आहे,” असं भाष्य त्यांनी यावेळी केलं आहे.
Read Also :
- “आमदार सरनाईक आणि त्यांचा लेटरबॉम्ब हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न”- देवेंद्र फडणवीस
- बाळासाहेबांबद्दल राज ठाकरेंना किती आदर हे चव्हाट्यावर आले – शिवसेना
- “मला वातावरण गरम करायला दोन मिनिटंही लागणार नाहीत, पण…”
- “ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा”
- “स्वबळाची भाषा करण्याआधी एकदा पायाखालची जमीन तपासून घ्या”- संजय राऊत