दिल्ली : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुप्त भेटीनंतर आणि काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर, राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. यानंतर आता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात, पवारांच्या ६ जनपथ निवासस्थानी बैठक झाली. दुपारी १ च्या सुमारास सुरू झालेली ही बैठक, तब्बल ४ तास चालली असून, भाजपविरोधात एकत्र येऊन लढण्यासाठी, यूपीएच्या बॅनरखाली एकत्र न येता, राष्ट्रमंच या बॅनरखाली एकत्र येण्यावर, या बैठकीत चर्चा झाली असल्याचं समजतं आहे.
हे पण वाचा, प्रशांत किशोर- शरद पवार यांच्यात खलबतं सुरु, राज्यात लवकरच राजकीय वादळ?
यूपीएला अपयश आल्याने, ‘राष्ट्रमंच’च्या बॅनरखाली काँग्रेस-भाजप विरोधी पक्ष एक आल्यास, भाजप आणि काँग्रेसला देखील धक्का देणं सोपं जाईल आणि या नव्या बॅनरच्या माध्यमातून देशभरातील जनतेला आकर्षित करणं सोपं जाईल, असं काही नेत्यांचं मत असल्याने, ‘राष्टमंच’ नावानं नवी आघाडी उघडण्यावर, या बैठकीत चर्चा झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, गेल्या १० दिवसांत या दोघांची ही दुसरी भेट असल्याने, देशभरात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, याचा सर्वात जास्त धसका राज्याच्या राजकारणानं घेतला असून, त्यामुळे राज्यातल्या राजकीय घडामोडींना देखील वेग आला आहे.
हे पण वाचा, युती होऊ शकते, मात्र आता निर्णय शिवसेनेनं घ्यायचा आहे- गिरीश बापट
दरम्यान, यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात असतानाच, पवारांनी मंगळवारी, दु. ४ वा. निवासस्थानी एक महत्वाची बैठक बोलावली असून, या बैठकीला १५-२० काँग्रेस-भाजप विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. यात, माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी आणि तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा, आम आदमी पक्षाचे संजय सिंग, राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोज झा यांची नावे आहेत. तसेच, या बैठकीत ‘राष्ट्रमंच’ या बॅनरखाली एकत्र येण्यावर चर्चा होणार असल्याची शक्यता, सूत्रांनी सांगितली आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष, उद्या होणाऱ्या या बैठकीकडे लागलं आहे.
हे पण वाचा, पाच वर्ष सरकार भक्कम; आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – नाना पटोले
दुसरीकडे, या उद्याच्या बैठकीला काँग्रेसला आमंत्रित करण्यात आलं की नाही याबाबत काही कळालं नसून, त्यामुळे उद्याच्या बैठकीला काँग्रेस उपस्थित राहणार का? की कॉंग्रेस शिवाय एकत्र येऊन आगामी काळात निवडणूक लडहवली जाणार, आणि असे असेल तर कॉंग्रेस यावर नेमकी काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही काँग्रेस महासचिव, राज्य प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांची २४ जूनला बैठक बोलावली आहे.
या बैठकीत काय झाले असेल…आणि उद्याच्या बैठकीत काय होईल….
- भाजपला पुन्हा एकदा केंद्रातल्या सत्तेपासून रोखण्यासाठी रणनीति.
- २०२४ च्या लोकसभा निवडणूकांच्या तयारीबाबत चर्चा.
- युपीए अध्यक्षपद शरद पवारांना देण्याबाबत चर्चा.
- भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधून पवारांचा चेहरा पुढे करण्यावर चर्चा
- भाजपविरोधात युपीएला मजबूत करण्यावर चर्चा
Read Also :
- “आमदार सरनाईक आणि त्यांचा लेटरबॉम्ब हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न”- देवेंद्र फडणवीस
- “मला वातावरण गरम करायला दोन मिनिटंही लागणार नाहीत, पण…”
- “स्वबळाची भाषा करण्याआधी एकदा पायाखालची जमीन तपासून घ्या”- संजय राऊत
- “राष्ट्रवादी व काँग्रेसने, मोठ्या मनाने शिवसेनेला सांभाळून घेतलंय, त्यांच्या हे लक्षात असावं”
- “नवी मुंबई विमानतळाला ‘छत्रपती शिवाजी महाराज’ हेच नाव पाहिजे”- राज ठाकरे