नवी मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून सुरु असलेल्या वादात आता मनसेने उडी घेतली असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, “नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असावं. आपण आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल बोलत असताना, हे लक्षात ठेवलं पाहिजे की, जे नाव आधीच विमानतळाला दिलं आहे, ते कसं बदलणार?, आज बाळासाहेब असते, तर त्यांनी देखील हेच सांगितलं असतं; की छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव या विमानतळाला द्या!,” असं मत व्यक्त केलं आहे.
हे पण वाचा, प्रशांत किशोर- शरद पवार यांच्यात खलबतं सुरु, राज्यात लवकरच राजकीय वादळ?
दरम्यान, या विमानतळाला भाजपकडून, दि. बा. पाटील यांचे नाव दिलं जावं, अशी मागणी होत आहे, तर आघाडी सरकार या विमानतळाला, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं जावं, यावर ठाम आहे. त्यासाठी सिडकोने तसा नामकरणाचा प्रस्ताव देखील मंजूर केला असल्याची माहिती, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली असून, यांनतर दि.बा.पाटील की बाळासाहेब ठाकरे हा नामकरणाचा मोठा वाद निर्माण झाला आहे.
हे पण वाचा, स्वबळाची भाषा करणे म्हणजे, पक्षाचा आत्मघात करून घेणे; काँग्रेसच्या मंत्र्यांची पक्ष प्रभारींकडे तक्रार
या पार्श्वभूमीवर, आज भाजपचे आमदार प्रशांत ठाकुर आणि महेश बालदी मुंबईत ‘कृष्णकुंज’वर राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, तेव्हा त्यांनी आपली आणि पक्षाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी, “नवं विमानतळ हे मुंबईच्याच विमानतळाचा एक भाग आहे. त्यामुळे त्याला, नवी मुंबई विमानतळाला जे नाव आहे, तेच द्यावं. त्यामुळे त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव राहणार आहे. या नावाला कुणीही विरोध करणार नाही,” असंही म्हटलं आहे.
हे पण वाचा, राम शिंदेंच्या मुलीचा विवाह सोहळा, रोहित पवार-फडणवीस आमनेसामने आले आणि…
तसेच, “विमानतळांना नाव काय द्यायचं, कोणतं असावं, याबाबदल केंद्र सरकार निर्णय घेतं. त्यामुळे आंतरराष्ठ्रीय विमानतळ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानेच होईल. बाळासाहेब हे आदरणीय आहेत, दि. बा. पाटील ज्येष्ठ नेते होते. मात्र, शिवरायांचं नाव देणंच योग्य ठरणार आहे. कारण, नवी मुंबईत असले; तरी विमानतळ हे ‘मुंबई विमानतळ’ म्हणूनच ओळखलं जाणार आहे,’ अशी भूमिका त्यांनी मांडली.
Read Also :
- युती होऊ शकते, मात्र आता निर्णय शिवसेनेनं घ्यायचा आहे- गिरीश बापट
- अजित पवारांच्या कार्यक्रमातील गर्दी अंगलट; राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक
- आमदार निलेश लंकेंच्या दक्षिण स्वारीमुळे दिग्ग्ज नेते हैराण; स्वकीय नेते देखील चिंतातुर अवस्थेत
- बिलोली- देगलूर पोटनिवडणुकीत भाजप पुन्हा एकदा पंढरपूर पॅटर्न राबविणार
- शरद पवार दिल्लीला रवाना, विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटणार; राजकीय वर्तुळात चर्चेला उधान