मुंबई : सध्या राज्यात, आगामी काळात येणाऱ्या निवडणूकांचे वारे वाहू लागले असून, प्रत्येक पक्ष त्या दृष्टीने आपआपल्या पक्षाची बांधणी करत आहे. तसेच, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, भाजप पक्षांनी स्वबळाचेही नारे दिले आहेत. अशातच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी, मुंबईच्या महापौर पदाबद्दल भाष्य केले आहे. “कोणी कितीही शड्डू ठोकले, तरी पुढचा महापौर सुद्धा शिवसेनेचाच होणार,” असं विधान त्यांनी केलं आहे.
हे पण वाचा, ‘गतवर्षी केलेल्या ‘करेक्ट’ कार्यक्रमाची होणार याही वर्षी होणार पुनरावृत्ती’
शिवसेनेसमोर यावेळी महापालिकेच्या निवडणुकांसाठी भाजपचे तगडे आव्हान असून, काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा नारा दिल्याने, हे आव्हान अधिक खडतर झाले आहे. त्यामुळे अशावेळी शिवसेना, राष्ट्रवादीची मंद घेणार का? की स्वबळावरच निवडणूक लढवणार याकडे आता लक्ष लागून आहे.
हे पण वाचा, भाई जगतापांनी बोलून दाखवली खंत, या आघाडीत काँग्रेस ‘तिसराच’
दरम्यान, आज शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने किशोरी पेडणेकर यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, “मुंबई महापालिका ज्या पद्धतीने शिवसेना चालवतं आहे. ज्या पद्धतीने आम्ही मुंबईकरांची काळजी घेत आहोत, त्यावरून येणाऱ्या काळात मुंबईत शिवसेनेचाच महापौर असेल,” असं विधान केलं आहे.
हे पण वाचा, राणे पिता-पुत्रांना बाळासाहेबांनी मोठे केले; काहीही बोलू नका आणि उपकार विसरू नका
यावेळी, “शिवसेनेने प्रत्येक निवडणुकीमध्ये संघर्ष केला आहे. आमचा पक्ष हा चावलं करणारा पक्ष आहे. आम्ही स्वतःउन कोणाशी संघर्ष करायला जात नाही, मात्र कुणी आलंच अंगावर आडवं, तर त्याला त्या संघर्षामध्ये घातल्याशिवाय राहत नाही,” असा इशारा त्यांनी यावेळी अप्रत्यक्षपणे इतर पक्षांना दिला आहे.
Read Also :
- नाईलाजास्तव भाजपमध्ये गेलेल्या अस्वस्थ नेत्यांची घरवापसी करावी लागेल – अशोक चव्हाण
- शिव प्रसाद काय असतो .. ते संजय राऊतांनी..आमदार वैभव नाईकना विचारावा..
- फटके देणारी शिवसेना राहिली नाही, आताची शिवसेना बिनशिंगाची – नारायण राणे
- पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या वर्चस्वामुळेच आमची तिकिटे कापली – सुनील देशमुख
- जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना १५ दिवस क्वारंटाईन करणार; अजित पवारांचा इशारा