बंगळूर : दोन वर्षांपूर्वी राज्याच्या कोल्हापूर, सांगली, सातारा भागाला पावसाच्या अतिवृष्टीचा जबर फटका बसला होता. यावेळी या भागात आलेल्या महापुराने अनेकांना बेघर केले होते, तर अनेकांची गुरे-जनावरे, संसार या पाण्याने वाहून नेला होता. तसेच, कित्येक हजार लोकांना स्थलांतर करावे लागले होते. ती पुनरावृत्ती परत होऊ नये आणि यावर कायमसाठी काही उपाययोजनांची अंमलबजावणी व्हावी, या हेतूने राज्याचे जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी, संवादातील अडथळे आणि आपापसातील मतभेद बाजूला सारून कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची भेट घेतली.
हे पण वाचा, जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना १५ दिवस क्वारंटाईन करणार; अजित पवारांचा इशारा
यावेळी, दोन्ही राज्यांनी, येत्या दरवर्षी पावसाळ्यात येणाऱ्या पूर परस्थितीवर मात करण्याचे ठरवले असून, राज्यात डायनॅमिक पध्दतीने ‘रियल टाईम डाटा’ यंत्रणा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे कर्नाटक राज्यानेही ही यंत्रणा बसववी अशी सूचना करण्यात आली आहे. या सूचनेला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शवली असून, यामुळे अलमट्टी धरणातील आवक-जावक यांची माहिती तातडीने दोन्ही राज्यांना प्राप्त होणार आहे. तसेच, अलमट्टीपुढील नारायणपूरच्या बंधाऱ्यापर्यंत पुराच्या पाण्याचे नियंत्रण करणे, यामुळे शक्य होणार आहे.
हे पण वाचा, हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरकरांची जाहीर माफी मागितली.
दरम्यान, ही बैठक कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांच्या बंगळूरमधल्या निवासस्थानी पार पडली असून, सातारा, सांगली भागात महापुराची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या पुढाकाराने ही बैठक झाली. मागच्या वर्षीदेखील राज्याच्या जलसंपदा विभागाने, पाण्याचे सुव्यवस्थित नियोजन करून या भागांतील पूर परिस्थिती टाळली होती. या बैठकीस दोन्ही नेत्यांसह दोन्ही राज्यांचे मुख्य सचिव व जलसंपदा पाटबंधारे अधिकारी उपस्थित होते. आहेत.
Read Also :
- भाई जगतापांनी बोलून दाखवली खंत, या आघाडीत काँग्रेस ‘तिसराच’
- राणे पिता-पुत्रांना बाळासाहेबांनी मोठे केले; काहीही बोलू नका आणि उपकार विसरू नका
- “अजित पवारांकडे १० सेकंद थांबून विचारपूस करायला देखील माणुसकी शिल्लक नाही”
- “आम्ही मराठी माणसाचा विषय कधीच सोडला नाही, त्यामुळे शिवसेना मराठी माणसाच्या मनात”
- भाजप-शिवसेनेत शाब्दिक युद्ध सुरूच, निलेश राणेंनी काढली शिवसेनेची लायकी, म्हणाले…