मुंबई : नाईलाजास्तव दुसऱ्या पक्षात गेलेल्या नेत्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करायची आहे. त्यांच्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, असं आवाहन मंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केलं आहे. आज खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या वर्चस्वामुळेच आमची तिकिटे कापली – सुनील देशमुख
ते म्हणाले की, डॉ. सुनिल देशमुख स्वगृही परतल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. मध्यंतरी अनेक काँग्रेस नेते नाईलाजास्तव भाजपात गेले. पण ते अस्वस्थ आहेत. त्यांचे मन तिकडे रमत नाही. त्यामुळे त्यांच्या घरवापसीबाबत तातडीने निर्णय घेऊन त्यांना पुन्हा जोमाने काँग्रेस उभारणीच्या कामाला लावले पाहिजे. त्या नेत्यांची इच्छा दुसरीकडे जायची नव्हती पण नाईलाजाने गेले.
‘मराठा समाजच अशोक चव्हाणांचा राजीनामा मागेल, भाजप मागणार नाही’
चव्हाण म्हणाले की, सुनील देशमुखांची व्यथा ऐकली. त्यांची कारकीर्द आम्ही पाहिलीय. ते लढणारे नेते आहेत. हे आम्ही कधी विसरु शकत नाही. ते कुठं जरी गेले तरी त्यांचं मन काँग्रेसमध्ये होतं. १२ वर्षांनंतर सुनील देशमुख परत आले. विदर्भात आणि महाराष्ट्रात त्यांनी जोमानं काम करावं, असं अशोक चव्हाण म्हणाले.
डॉ. सुनिल देशमुख स्वगृही परतल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. मध्यंतरी अनेक काँग्रेस नेते नाईलाजास्तव भाजपात गेले. पण ते अस्वस्थ आहेत. त्यांचे मन तिकडे रमत नाही. त्यामुळे त्यांच्या घरवापसीबाबत तातडीने निर्णय घेऊन त्यांना पुन्हा जोमाने काँग्रेस उभारणीच्या कामाला लावले पाहिजे. pic.twitter.com/OftEh4i0jq
— Ashok Chavan (@AshokChavanINC) June 19, 2021
‘‘अशोक चव्हाण यांच्या मनमानी कारभारामुळे सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकले नाही’’ आशिष शेलार
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत सुनील देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. १९९९ पर्यंत काँग्रेसमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचं वर्चस्व होतं. मी कुणाचं नाव घेणार नाही. पण ते आम्हाला तिकीटच मिळू द्यायचे नाहीत. १९९९९ काँग्रेमधून राष्ट्रवादी वेगळा झाला आणि एका झटक्यात मी, अनिस अहमद, नाना पटोले आणि नितीन राऊत निवडून आलो, असा दावा देशमुख यांनी केला. त्यामुळे देशमुख यांच्यासह विदर्भातील नेत्यांचं तिकीट कापणारे पश्चिम महाराष्ट्रातील ते नेते कोण? असा सवाल केला जात आहे.
Read Also :
- शिव प्रसाद काय असतो .. ते संजय राऊतांनी..आमदार वैभव नाईकना विचारावा..
- राणे पिता-पुत्रांना बाळासाहेबांनी मोठे केले; काहीही बोलू नका आणि उपकार विसरू नका
- भाजप-शिवसेनेत शाब्दिक युद्ध सुरूच, निलेश राणेंनी काढली शिवसेनेची लायकी, म्हणाले…
- ‘आंदोलन करायला भाजप आजही घाबरली नाही आणि उद्याही घाबरणार नाही’
- शाब्बास रे वाघानो! शिवसैनिकांना भिडणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचा नितेश राणेंकडून सत्कार