रत्नागिरी : शिवसेनेचे आमदार व माजी मंत्री उदय सामंत यांच्यावर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी टिका केली होती. उदय सामंत यांच्या टिकेनंतर विनायक राऊत यांनी आपले संपर्क कार्यालय स्थलांतर केले आहे. त्यानंतर विनायक राऊतांचे मारुती मंदिर येथील संपर्क कार्यालय शिवसेना आमदार राजन साळवी यांच्या कार्यालयात स्थलांतरित केले आहे. आमदार उदय सामंत आणि विनायक राऊत यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेल्याने विनायक राऊत यांनी आपले संपर्क कार्यालय स्थलांतरीत केले असल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकाविण्याची संधी, तयार रहा; शरद पवार
रत्नागिरीचा उपरा आणि सिंधुदुर्गातील तो बडगा. दोन्ही शिवसेनेचे बागडा आणि कोडगा. शिवसेनेशी बंडखोरी केलीत आणि बेशरमपणे सांगतायत आम्ही शिवसेनेचे आहोत. काल परवा आलेले म्हणतायत मला शिवसेना वाचवायची आहे. रत्नागिरीत असं कारटं जन्माला यावे याची मला लाज वाटते. गद्दारीच व्याख्या म्हणजे एकाच्या घरी नांदायचे दुसऱ्याचे मंगळसुत्र घालायचं, तिसऱ्याच्या घरी संसार करायचा आणि गर्भ चौथ्याचा वाढवायचा अशी टिका विनायक राऊत यांनी उदय सामंत यांच्यावर केली होती.
“आम्ही केंद्र सरकारविरोधात तुटून पडू, तुम्ही राज्य सरकारवर तूटून पडा”; सुप्रिया सुळे
रत्नागिरीमध्ये झालेल्या शिवसेना मेळाव्यात खासदार विनायक राऊत यांनी सामंत आणि बंडखोर आमदारांवर टिका केली होती. राऊताच्या टिकेनंतर माझा कोणावरच राग नाही, पण दुःख एकच वाटते की, विनायक राऊत यांना मी आपलं मानलं पण त्यांनी मला गद्दार, उपरा..अजून बरंच काही म्हणणं मला रुचले नाही, अशी खंत सामंत यांनी व्यक्त केली होती. राऊतांचे गैरसमज दूर करीन असं आमदार सामंत म्हणाले होते. याच वक्तव्यावरून राऊत आणि सामंत याच्यात नाराजी दिसुन आली होती.
मुख्यमंत्र्यांच्या स्थानिक शिष्याची मोठी शिष्टाई, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने बदली नकोचा आग्रह
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकित शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांना रत्नागिरी विधानसभा मतदार संघाचे चांगलेच मताधिक्य मिळेले होते. यामध्ये आमदार उदय सामंत यांचा मोठा वाटा होता. लोकसभा निवडणुकिच्या दीड वर्षातच दोघांमध्ये वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेच्या 40 आमदाराच्या बंडानंतर सामंत शिंदे गटात सामील झाले होते. ठाकरेंसोबत असणाऱ्या विनायक राऊतांनी सामंत यांच्यावर टिका केली. रत्नागिरी जिल्हयात आमदार उदय सामंत यांचा मोठा जनधार आहे. याचा फायदा खासदार विनायक राऊत यांना लोकसभा निवडणुकीत झाला होता. येणाऱ्या निवडणुकांना शिवसेनेला याचा फटका बसणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Read also
- “केसरकर साहेब.. हवेतून खाली या. अजितदादांसमोरील तुमची केविलवाणी अवस्था अनेकदा पहिली”
- “आम्ही केंद्र सरकारविरोधात तुटून पडू, तुम्ही राज्य सरकारवर तूटून पडा”; सुप्रिया सुळे
- “आधी फोन कोणी करावा, यावरून शिवसेना भाजप युतीचा खोळंबा”; इतर मंत्र्यांचा शपथविधी कधी?
- “ज्या ताटात जेवलात, त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात”? आव्हाडांचा केसरकरांना टोला
- “सरकार बेकायदेशीर, केसरकर तुम्ही सुद्धा बेकायदेशीर प्रवक्ते”