सातारा : तौक्ते चक्रीवादळाचा फटका किनारपट्टीलगतच्या तसेच, राज्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांना बसला. या सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई, महाविकास आघाडी सरकारने तातडीने द्यावी, अशी मागणी राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली होती.
दरम्यान, त्यांच्या या वक्तव्याचा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी समाचार घेतला असून, माध्यमांशी बाेलताना त्यांनी, “आघाडी सरकार शेतक-यांसाठी काय करतंय, यायची राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री राहिलेल्या सदाभाऊ खोत यांना पुसटशी कल्पना देखील नसावी, या गोष्टीची कीव करावीशी वाटते. केवळ तोकड्या माहितीच्या आधारावर सरकारवर टीका करणे योग्य नाही,’ अशी खंत त्यांनी बोलून दाखवली आहे.
तसेच, सदाभाऊंनी समोर यावे आणि या आघाडी सरकारने शेतकऱ्यांना किती मदत देऊ केली आणि तुमच्या सरकारच्या काळात किती मदत झाली, याची सविस्तर चर्चा करावी. या खुल्या आव्हानासाठी मी महाविकास आघाडीचा मंत्री म्हणून कधीही तयार आहे,’ असे सांगत, ‘या संकट काळात देखील खतांची दरवाढ करून, शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवण्याचे काम केंद्रातील भाजप सरकार करत आहे. त्यांचे त्याकडे कदाचित लक्ष जात नसावे. त्या उलट जे सरकार शेतक-यांसाठी झटत आहे ते त्याच सरकारवर टीका करत आहेत,” अशी टीका त्यांनी केली आहे.
यावेळी, आघाडी सरकारची बाजू मांडताना त्यांनी, “मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने सत्तेत आल्या आल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली. आणि थेट २२ हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. तसेच, वादळे असू देत किंवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती, शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने नेहमी तिजोरीतून मदत केली आहे,’ असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता शंभूराज देसाई यांनी दिलेले हे खुले आव्हान सदाभाऊ स्वीकारतात की अजून काही वेगळी यावर प्रतिक्रिया देतात, हे लवकरच कळेल.
Read Also :
- दर वाढ कमी करा म्हणून पत्र लिहिणारे शरद पवारंच दर वाढीस कारणीभूत – केशव उपाध्ये
- सत्तेत आल्यापासून जे पाय हवेत गेले होते, ते जमिनीवर असल्याची जाणीव झाल्याबद्दल आनंद आहे!
- काम करतयं राष्ट्रवादीचा आमदार अन् कौतूक करतयं भाजपचा आमदार..
- प्रक्रिया पारदर्शक, वशिलेबाजीला थारा नाही; पिंपरी-चिंचवडकरवासीयांचे स्वतःच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण
- अरुण गवळीची दगडी चाळ होणार जमीनदोस्त! ‘डॅडी’ची दगडी चाळ इतिहासात जमा?