मुंबई : इंडिया आघाडीतील आमच्या काही मित्रपक्षांची पाच राज्याबाबत काही मते आहेत. खासकरून काॅंग्रेससारखा मोठा पक्ष असतो तेव्हा त्या राज्यातील लहान-लहान घटकांना विश्वासात घेतलं जात नाही. आघाडी पुढे घेऊन जायची असती तेव्हा पक्ष लहान असो वा मोठा सर्वांना सोबत घेऊन गेले असते तर कदाचित चांगला फायदा होऊ शकला असता. अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर दिली आहे.
हेही वाचा…“गॅरंटी बोले तो मोदी जी, पनौती बोले तो..,”चित्रा वाघ यांना राहुल गांधींवर निशाणा
राजस्थान आणि छत्तीसगड राज्यातील सत्ता भाजपने काॅंग्रेसकडून खेचून आणली आहे. तर मध्यप्रदेशात सत्तापरिवर्तन न होता जनतेने पुन्हा भाजपला कौल दिला आहे. यामध्ये काॅंग्रेसला फक्त तेलंगणात सत्ता स्थापन करता आली आहे. तर मिझोरममध्ये काॅंग्रेसला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
हेही वाचा…“मुंबईची जलवाहिनी फुटली, लोकांचे मोठे हाल,” आदित्य ठाकरेंचे पालिकेला कडक सवाल
दरम्यान, महाराष्ट्रात २०१४ मध्ये शिवसेनेच्या बाबतीच झालं होतं, मोदींची लाट आल्यानंतर शिवसेनेसोबतची युती तोडली. आता भाजपला पुन्हा लाट दिसत आहे. त्यामुळे मला चिंता आहे की सरकारसोबत जे बसले आहेत. त्यांचं काय होणार. आपका क्या हो गा कालिया असा सवाल आहे. परंतु काॅंग्रेससोबत आमचं नातं होतं तसं आहे. दिल्ली स्तरावर आमचं बोलणं सुरू आहे. महाराष्ट्रात त्यापद्धतीने जागावाटप केलं जाईल असं राऊतांनी स्पष्ट केलंय.
READ ALSO :
हेही वाचा…ZPM चा मोठा विजय, सत्ताधारी MNF ला दिला छोबीपछाड, काॅंग्रेस अन् भाजपच्या वाट्याला किती जागा ?
हेही वाचा…पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सिंधुदुर्गात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण
हेही वाचा…हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधी ‘आप’ला मिळाली चांगली बातमी
हेही वाचा…तेलंगणा निवडणुकीचा पुण्यात परिणाम, ‘या’ नेत्याचे लागले भावी खासदार म्हणून बॅनर
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीसांनी माणसं घडवली नाही तर पक्षातील माणसं संपवली”, कोणी केली टिका ?