नवी दिल्ली : आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनाच्या अगोदर संवाद साधला. यातच आज आम आदमी पक्षाचे नेते आणि खासदार राघव चढ्ढा यांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
हेही वाचा…काका काॅंग्रेसचा तर पुतण्या भाजपचा..! रंगला मोठा डाव, म्हणाले की, “हाताच्या मदतीशिवाय कमळ कसे फुलणार”
राघव चड्ढा यांचे राज्यसभेतील निलंबन सभापती जगदीप धनगड यांनी मागे घेतले हे. संसदेच्या पावसाळी अधिवेशन दरम्यान त्यांना निलंबित करण्यात आले होते. राघव चढ्ढा यांच्या निलंबनाबाबत आज संसदेत राज्यसभेच्या विशेषाधिकारी समितीची बैठक झाली. त्यानंतर त्यांचे निलंबन मागे घेण्यात आला आहे. दरम्यान, यावर बोलताना सर्वाच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे माझे राज्यसभेचे निलंबन मागे घेण्यात आल्याचं चढ्ढा यांनी म्हटले.
हेही वाचा…शिंदेंचा मोठा मंत्री अडचणीत येणार ? व्हिडीओ व्हायरल करण्याचा जरांगे पाटलांनी दिला इशारा
सभागृहात मांडलेल्या प्रस्तावाद्वावे निलंबन मागे घेण्यात आले आहे. मला ११५ दिवसांसाठी निलंबित करण्यात आले. या काळात मला लोकांचे प्रश्न विचारता आले नाहीत. आज मी माननीय सर्वोच्च न्यायालय आणि राज्यसभा अध्यक्षांचे आभार मानतो असंही ते म्हणाले. चढ्ढा यांच्याविरोधात तक्रार झाल्यानंतर त्यांना ११ ऑगस्ट रोजी निलंबित करण्यात आले होते. निवड समितीमध्ये त्यांची नावे समाविष्ट करण्यापुर्वी राज्यसभेच्या पाच खासदारांची संमती न घेतल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता.
READ ALSO :
हेही वाचा…तेलंगणा निवडणुकीचा पुण्यात परिणाम, ‘या’ नेत्याचे लागले भावी खासदार म्हणून बॅनर
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीसांनी माणसं घडवली नाही तर पक्षातील माणसं संपवली”, कोणी केली टिका ?
हेही वाचा…“गॅरंटी बोले तो मोदी जी, पनौती बोले तो..,”चित्रा वाघ यांना राहुल गांधींवर निशाणा
हेही वाचा…“मुंबईची जलवाहिनी फुटली, लोकांचे मोठे हाल,” आदित्य ठाकरेंचे पालिकेला कडक सवाल
हेही वाचा…विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाची सत्ता उलथावून लावली, उपमुख्यमंत्र्यांचा मोठा पराभव, मुख्यमंत्रीही पिछाडीवर