सिंधुदूर्ग : भारतीय नौसेनेच्या वतीने यावर्षीचा नौसेना दिवस सिंधुदूर्ग किल्ला येथे साजरा केला जात आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. मालवण-राडकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे यावेळी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहे.
हेही वाचा…विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाची सत्ता उलथावून लावली, उपमुख्यमंत्र्यांचा मोठा पराभव, मुख्यमंत्रीही पिछाडीवर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर अलिकडेच बैठक पार पडली. या बैठकीस शालेयशिक्षण मंत्री दिपक केसरकर पर्यटन मंत्री मंगल प्रभातलोढा यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. यातच मोदी यांनी नौसेना दिवस हा सिंधुदूर्ग येथे आयोजित करण्याचे निर्देश दिले असल्याचं बैठकीत सांगितले असून जलदूर्गांच्या पाहणीअंती सिंधुदूर्ग किल्ला आणि परिसराची निवड केली असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
हेही वाचा…काका काॅंग्रेसचा तर पुतण्या भाजपचा..! रंगला मोठा डाव, म्हणाले की, “हाताच्या मदतीशिवाय कमळ कसे फुलणार”
पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. या निमित्ताने नारायण राणेंनी केलेली पोस्ट चर्चेत आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सिंधुदुर्ग किल्ल्यावर भारतीय नौदल दिवस साजरा केला जातो आहे. याचा विशेष आनंद आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा दिन साजरा होतो आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…शिंदेंचा मोठा मंत्री अडचणीत येणार ? व्हिडीओ व्हायरल करण्याचा जरांगे पाटलांनी दिला इशारा
यातच सिंधुदुर्गच्या समुद्र किनारी राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा ४३ फुट उंच पुतळा उभारण्यात आला आहे. तसे आर्ट गॅलरीही साकारण्यात आली असून नौसेना दिवस कार्यक्रमात नौसेनेच्या विविध युद्धनौका, लढाऊ विमाने सहभागी होणार आहेत. तारकर्ली आणि मालवणे समुद्र किनारी यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधी ‘आप’ला मिळाली चांगली बातमी
हेही वाचा…तेलंगणा निवडणुकीचा पुण्यात परिणाम, ‘या’ नेत्याचे लागले भावी खासदार म्हणून बॅनर
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीसांनी माणसं घडवली नाही तर पक्षातील माणसं संपवली”, कोणी केली टिका ?
हेही वाचा…“गॅरंटी बोले तो मोदी जी, पनौती बोले तो..,”चित्रा वाघ यांना राहुल गांधींवर निशाणा
हेही वाचा…“मुंबईची जलवाहिनी फुटली, लोकांचे मोठे हाल,” आदित्य ठाकरेंचे पालिकेला कडक सवाल