पुणे : ‘महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) राज्य शासनात विलीनीकरण करणे हाच अंतिम पर्याय सरकारपुढे आहे. सरकार संपात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असून रोज नव्या पुड्या सोडत आहे. संप हाटत नाहीत म्हणून खासगीकरणाची चर्चा सुरू आहे. काही झाले, तरी या संपाचा गिरणी संप होऊ देणार नाही. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल,’’ असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला.
एसटी महामंडळाचे खासगीकरण होणार ही तर एक अफवा – माजी मंत्री सदाभाऊ खोत
भाजपतर्फे ‘एक सढळ मदतीचा अढळ हात’ या उपक्रमांतर्गत स्वारगेट परिसरातील सातारा रस्त्यावरील एसटी कॉलनीतील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला एक महिन्याच्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. पडळकर म्हणाले, ‘‘एसटीतला भ्रष्टाचार थांबवला, तरी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यां इतका पगार एसटी कर्मचाऱ्यांना मिळू शकेल. महामंडळ कुणाच्या बापाजाद्याची जहागिरी नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या ३८ आत्महत्या झाल्या, तरी दुःख संपत नाही, हे दुर्दैव आहे. संपकऱ्यांची सरकारशी चर्चेशी तयारी; पण सरकारला मार्ग काढायचा नाही.’’
‘पवार म्हणजे फक्त तडफड, त्यांना कुठेच जम बसवता आला नाही’; निलेश राणेंचे टीकास्त्र
एसटी आंदोलनात मानवतेच्या भावनेतून पाहिलं तर सरकार वेडेपिसे झाले आहे. सरकारला सुचायचे बंद झाले आहे. या संपामुळे शरद पवार यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. एसटीची मोठी मान्यताप्राप्त असलेली संघटना पवारांची आहे. आजपर्यंत पवार यांनी मान्यताप्राप्त संघटनेला हाताशी धरून कर्मचाऱ्यांवर अन्याय केला आहे. पण कर्मचाऱ्यांना आता अन्यायाची जाणीव झाली आहे. कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी लगेचच प्रतिक्रिया दिली. मात्र, एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत. त्यावर सांत्वनाचे दोन शब्द बोलायला तयार नाहीत, असे पडळकर म्हणाले.
Read Also :
- “आजची सकाळ मला अखंड हिंदुस्तानातील शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्याची पहाट वाटते”; संजय राऊत यांचे प्रतिपादन
- सोमय्यांचा अर्जुन खोतकरांवर 100 कोटी घोटाळ्याचा आरोप, खोतकर म्हणाले…
- रत्नागिरीतील तब्बल ८६ एसटी कर्मचारी निलंबित; संपकरी कर्मचारी मात्र आंदोलनावर ठाम
- निवडणूक डोळ्यासमोर ठेऊनच कायदे रद्द करण्याची उपरती; राजू शेट्टींचा लेख व्हायरल
- वेळोवेळी महाविकास आघाडीला कोंडीत गाठणाऱ्या चित्रा वाघ यांना भाजपने दाखवला कात्रजचा घाट