कोल्हापूर: तीन वर्षांपूर्वी पोलीस भरतीची जाहिरात काढून विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेतले; परंतु पुढे प्रक्रिया राबविली नाही. दरम्यान, गेल्या वर्षापासून कोरोना साथीमुळे भरती रखडली. आता ही साथ केव्हा संपेल आणि भरती केव्हा होईल, याची आतुरता भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना लागली आहे. काही दिवसांपूर्वीच राज्याच्या गृहमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागलेले अनिल देशमुख यांनी लवकरात लवकर १२,५३८ जागांसाठी पोलिस भरती प्रक्रिया राबविणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र घोषणा हवेतच विरली.
हे पण वाचा, हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरकरांची जाहीर माफी मागितली.
गेल्या तब्बल तीन वर्षांपासून रखडलेली महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया तातडीने सुरू करून तयारी करणाऱ्या युवकांना दिलासा द्यावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा.दिलीप वळसे पाटील यांना निवेदनाद्वारे विनंती केली.
हे पण वाचा, बंटी पाटलांनी शब्द पाळला; गोकुळ कडून दूध उत्पादकांच्या दुधासाठी २ रुपये दरवाढ जाहीर
हे पण वाचा, गोकुळने शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याचे काम केले आहे; शरद पवार यांनी केली गोकुळची मनभरून प्रशंसा
पोलिस भरती प्रक्रिया रखडल्यामुळे भरतीची तयारी करणाऱ्या विशेषतः ग्रामीण भागातील तरुणांचं यामुळे अतोनात नुकसान होत आहे. उमेदीची वाया जाणारी वर्षे, वाढतं वय, सरावात सातत्य राखण्यातल्या आर्थिक व इतर मर्यादा, बेरोजगारी व या सर्वांमुळे येणारं नैराश्य अशा पेचप्रसंगात ही तरुण मुलं अडकली आहेत. यांना दिलासा देणे गरजेचे आहे. राज्य सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा असे शौमिका महाडिक यांनी निवेदनात म्हटले आहे.
हे पण वाचा,
धनंजय महाडिक आणि राजू शेट्टी भेटीने जि.प. अध्यक्षपदाच्या हालचाली वाढल्या
गोकुळ मध्ये सत्ता बंटी पाटलांची मात्र सर्व ठेकेदारी महाडिकांची