मुंबई : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अन्नत्याग उपोषण करून मंत्रालय ताब्यात घेण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. मात्र सरकारने चर्चासाठी वेळ दिल्यानंतर रविकांत तुपकर आणि राज्य सरकारमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली. यामध्ये रविकांत तुपकर यांच्या जवळपास ७० ते ८० टक्के मागण्या मान्य केल्या असून रविकांत तुपकर यांनी सरकारला पंधरा दिवसाची मुदत दिली आहे. पंधरा दिवसात मागण्या मान्य झाल्या नाही तर नागपुरात हिवाळी अधिवेशनात यापेक्षा मोठा आंदोलन उभं करू असा इशाराही त्यांनी दिलाय.
हेही वाचा…“नालायकांनो..! हे पाप तुम्हाला फेडावं लागणार आहे”, ठाकरे अन् शिंदे गटातला वाद पेटला
सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत राज्य सरकारने आम्ही केलेल्या काही मागण्या मान्य केल्या आहेत. सोयाबीन कापसाच्या दरवाढीबाबात केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ जाणार आहे. त्यात आमचाही समावेश आहे. केंद्र सरकारशी बोलल्याशिवाय कापुस सोयाबीन दरवाढीचा निर्णय होत नाही. यासाठी निर्यात करा, आयात शुल्क ३० टक्क्यांपर्यंत वाढवा. त्यानंतर आमच्यासमोर पियुष गोयल यांना फोन केल्यानंतर केंद्र सरकार येत्या अधिवेशनात याबाबत निर्णय घेईल. असं रविकांत तुपकर यांनी सांगितलं.
हेही वाचा…राहुल नार्वेकरांचा मोठा कस लागणार ? सकाळी अधिवेशन तर दुपारी शिवसेना अपात्र याचिकेवर सुनावणी
तसेच येलो मोझॉकमुळे सोयाबीनचं नुकसान झालं आहे. त्यासंदर्भात पिकविमाच्याबाबत या अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये घेऊन जाहीर करण्याचा शब्द दिला. यातच शेतीला मजबुत अशा कॅंपाऊंटची योजना देखील आणतो असंही त्यांनी सांगितलंय. अनुदानाचे पैसेही लवकर देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यातच सरकारने आमच्याकडून पंधरा दिवसाची मुदत मागितली आहे. असंही रविकांत तुपकर यांनी म्हटलंय.
दरम्यान, सरकारने ७० ते ८० टक्के मागण्या मान्य केल्या आहेत. परंतु त्यांनी शब्द दिला, मागण्या मान्य केल्या म्हणजे आम्ही थांबलो असं होत नाही. पंधरा दिवसाची मुदत सरकारला दिली आहे. येत्या पंधरा दिवसात आमच्या मागण्या मान्य न झाल्या नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात यापेक्षा मोठा आंदोलन उभं करू, असा इशाराही रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मराठ्यांना कुणबीचा दाखला देण्यावाचून आता देशातील कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही”
हेही वाचा…ललित पाटील कुणाला हप्ते देत होता? 40 पोलिस, काही नेते, सुषमा अंधारेंच्या हाती लागलं ‘ते’ पत्र
हेही वाचा…“जाती जातीत भांडण करणाऱ्या नेत्यांमध्येच भांडणं, तीन पक्षांचा तमाशा”, यशोमती ठाकूर यांनी डिवचलं
हेही वाचा…सरकारच्या विरोधात शरद पवार गटाचा ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’, जंयत पाटलांनी केली घोषणा
हेही वाचा…कामकाज सल्लागार समितीची बैठक संपली, एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय