कऱ्हाड : ‘कोरोनाच्या संकटामुळे ऑनलाईन शिक्षण व ऑनलाईन परीक्षेचा निर्णय घ्यावा लागला. आता १ फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालये आपण प्रत्यक्ष सुरू करीत आहोत. १५ फेब्रुवारीपर्यंतच्या परीक्षा ऑनलाईनच होणार आहेत; पण त्यानंतर विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षेसाठी सज्ज राहावे,’ असे आवाहन राज्याचे तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले. कऱ्हाड येथील शासकीय अभियांत्रिकी, फार्मसी महाविद्यालयात सोमवारी मंत्री सामंत यांनी आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
भाजपच्या नेत्यांची मुले काय चणे-शेंगदाणे, ढोकळा विकतात का? संजय राऊतांचा सवाल
मंत्री सामंत म्हणाले, ‘शैक्षणिक गुणवत्ता टिकवण्यासाठी ऑफलाईन शिक्षणाची गरज आहे. पण कोरोनाच्या संकटामुळे ऑनलाईनचा नाईलाजाने आधार घ्यावा लागला. आता १ फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालये पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तरीदेखील स्थानिक परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी काही निर्णय घेऊ शकतात.
नितेश राणेंचे स्वीय सहाय्य्क राकेश परब पोलीस ठाण्यात हजर; राणेंना जेल की बेल?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. मात्र, त्यामुळे विद्यार्थी वर्गाबाहेर राहू नयेत म्हणून लसीकरणाचे शिबिर महाविद्यालयात राबवण्यात येणार आहेत, असेही मंत्री सामंत यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. त्याचबरोबर महाविद्यालयातील प्राचार्यांना खर्च करताना मर्यादा होत्या. त्या मर्यादाही वाढविण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. तो निर्णय राज्यभरासाठी असल्याचे त्यांनी सांगितले.
Read also:
- पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेची नावे जाहीर; कोणत्या भागाला काय नाव…. वाचा सविस्तर…
- शिक्षण मंत्र्यांच्या घरासमोर विद्यार्थ्यांचं वादळी आंदोलन; पोलिसांचा आंदोलनकांवर लाठीचार्ज
- खुलेआम वाईन विक्रीतून सरकार नेमकं काय साध्य करणार? अण्णा हजारेंचा सवाल
- “संजय” ला आता दिव्यदृष्टी प्राप्त झाली का? मनसेची राऊतांवर खोचक टीका
- म्हापश्यातील कुठलाही वार्ड विकास कामांपासून वंचित राहिला आहे, असे कुणीही म्हणू शकत नाही – वायंगणकर