मुंबई : सगळ्याच समाजाला धोका देण्याचा काम राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. अलिकडेच एकनाथ शिंदे अपात्र झाले तरी त्यांना विधानपरिषदेवर नेऊ असं फडणवीस म्हणाले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना फसवलं आहे. त्यातच आता अजित पवार गट देखील भाजपसोबत आहे. त्यामुळे संभाल के रहो, असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाला इशारा दिला आहे.
हेही वाचा…“सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत आतापर्यंत काय काय झालं?” वाचा आतली बातमी
राज्यात मराठा आरक्षण, लिंगायत आरक्षण, धनगर, आणि मुस्लिम आरक्षणाबाबत संसदेत इतर नेत्यांपेक्षा सर्वात जास्त आवाज उठवला आहे. परंतु राज्यातील सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास अपयशी ठरलं आहे. प्रचारासाठी दुसऱ्या राज्यात त्यांना जायला वेळ आहे. परंतु राज्यातील कायदा व सुव्यवस्था पाहण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. हे सरकारचे अपयश आहे. त्यामुळे फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे. अशी मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
हेही वाचा…मराठा आंदोलन चिघळलं, सर्वपक्षीय आमदारांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी याआधी धनगर समाजालाही फसवलं आहे. आमच्या घरासमोर येऊन पहिल्या कॅबिनेट बैठकीत निर्णय घेऊ असं म्हटलं होतं. परंतु धनगर समाजाला त्यांनी फसवलं आहे. तसेच एकनाथ शिंदे यांना देखील त्यांनी फसवलंय. त्यामुळे अजित पवार गटाला विनंती आहे की, कधी एका ताटात जेवलोय आपण असे म्हणत भाजपपासून सांभाळून राहा असा इशाराही सुप्रिया सुळे यांनी दिलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“सध्या आरक्षणाच्या नावाने केवळ पोकळ बैठकांचे सत्र”, संभाजी राजेंची सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीवर नाराजी
हेही वाचा…“आम्ही मनावर घेतलं तर यांचा आवाज ५ मिनिटात बंद करू”, जरांगे पाटलांनी कुणाला दिला इशारा ?
हेही वाचा…“तोपर्यंत कामगारांचा संप हा बेमुदत सुरूच राहिल,” एक्साईड इंडस्ट्रीज येथील कामगारांनी पुकारला संप
हेही वाचा…मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांनी मंजूर केला ठराव , मुख्यमंत्र्यांनीही केलं मोठं आवाहन
हेही वाचा…“सर्वच समाजाला फसवण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलंय, राजीनामा द्या,” सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर हल्लाबोल