मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात आज मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवावी यासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांचा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आहे. या बैठकीसाठी ३२ नेते आणि लोकप्रतिनिधी उपस्थितीत होते. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावं हे सर्वांचचं असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…पुण्यातील आंदोलनप्रकरणी आतापर्यंत ४०० जणांवर गुन्हे दाखल, तर १२ हजार २९४ कुणबी प्रमाणपत्राचं वाटप
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत आहे. याच्या कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण दिले जाऊ शकते व त्यासंदर्भात राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. कायदेशीर कार्यवाही शक्य तितक्या लवकर करण्यात यावी. मात्र, त्याला आवश्यक तो वेळ देणे गरजेचे आहे, हे पण लक्षात घेणे आवश्यक आहे. राज्यामध्ये ज्या हिंसेच्या घटना घडल्या आहेत व घडत आहेत त्या अयोग्य असून यामुळे आंदोलनाची बदनामी होत आहे.
हेही वाचा…मराठा आरक्षणासंदर्भात राजकीय हालचाली वाढल्या, सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरू
या घटनांबद्दल आम्ही तीव्र नापसंती व्यक्त करतो. राज्यात कुणीही कायदा हाती घेऊ नये, राज्यातील शांतता तथा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच या सर्व प्रयत्नांना उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनीही सहकार्य करावे व आपले उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
हेही वाचा…बीडच्या घटनेत ३४ आरोपींना अटक..! “तर बीडला येईल आणि मराठे काय असतात ते कळेल”, मनोज जरांगे पाटलांनी दिला इशारा
तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. सर्व कायदेशीर बाबी तपासून टिकणारे आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकार सर्व बाजूने प्रयत्न करत आहे. असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“सर्वच समाजाला फसवण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलंय, राजीनामा द्या,” सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
हेही वाचा…“सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत आतापर्यंत काय काय झालं?” वाचा आतली बातमी
हेही वाचा…मराठा आंदोलन चिघळलं, सर्वपक्षीय आमदारांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
हेही वाचा…“आरक्षण मोडून काढण्याचा मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्याचा डाव,” जरांगे पाटलांनी व्यक्त केली शंका
हेही वाचा…“पेटता महाराष्ट्र नको तर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र हवा”