मुंबई : मराठा आंदोलनाला बीड जिल्ह्यात हिसंक वळण लागल्याने बीड आणि जालना शहरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्ह्यात संचारबंदी लागून करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनानंतर पोलीस यंत्रणा सतर्क मोडवर आली आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून सर्वांवर कारवाई होणार असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी त्यावर पलटवार केला आहे.
हेही वाचा…“घर जळत होतं, तेव्हा मुल देवा घरात हात जोडून होती,” क्षीरसागर कुटुंबीयांनी सांगितला धक्कादायक अनुभव
बीड शहारात झालेल्या जाळपोळीच्या घटनेवरून जवळपास १०० पेक्षा अधिक अज्ञांतावर गुन्हे दाखल करण्यात आले असून योग्य ती कारवाई केली जाईल. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. मराठ्यांच्या लहान लहान मुलांवर गुन्हे दाखल करू नका. अन्यथा जिल्ह्याधिकारी कार्यालयात येऊन बसेन असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे.
हेही वाचा…“जाळपोळ झाली तेव्हा घरात होतो, काही लोकांनी ठरवून जाळपोळ केली”, योगेश क्षीरसागरांनी दिली प्रतिक्रिया
सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळालं नाही तर संध्याकाळपासून पाणीही सोडणार आहे. आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावा, आंदोलन शांततेतच सुरू राहणार असून आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. अर्धवट आरक्षण आम्ही घेणार नाही असंही मनोज जरांगे पाटलांनी म्हटलयं. तर दोनपैकी एक उपमुख्यमंत्री मोठे कलाकार रंगीबेरंगी लोकांना घेऊन भाजपची वाट लावली असे म्हणत मनोज जरांगे पाटलांनी नाव न घेता फडणवीसांवर टिका केली आहे.
हेही वाचा…प्रवेश बंदी असताना आलेल्या आमदार विश्वजीत कदम यांना पाठवलं माघारी
दरम्यान, मराठा आंदोलन दडपण्यासाठी इंटरनेट बंद करण्यात आले आहे. मराठा समाजाचे आंदोलन मोडण्याचा हा डाव आहे. मराठा आरक्षण भेटल्याशिवाय हटणार नाही. हजारो लोकांनी मला राक्षी खडा पहारा दिला आहे. इंटरनेट बंद करून आंदोलन मोडू शकत नाही. १०० टक्के मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा डाव दिसतोय, कायदा सुव्यवस्था आम्ही बिघडवणार नाही. असंही त्यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“पेटता महाराष्ट्र नको तर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र हवा”
हेही वाचा…पुण्यातील आंदोलनप्रकरणी आतापर्यंत ४०० जणांवर गुन्हे दाखल, तर १२ हजार २९४ कुणबी प्रमाणपत्राचं वाटप
हेही वाचा…मराठा आरक्षणासंदर्भात राजकीय हालचाली वाढल्या, सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरू
हेही वाचा…बीडच्या घटनेत ३४ आरोपींना अटक..! “तर बीडला येईल आणि मराठे काय असतात ते कळेल”, मनोज जरांगे पाटलांनी दिला इशारा
हेही वाचा…“शिंदे समितीचा अहवाल प्राथमिक असून अजून काम करणं बाकी”, मराठा आरक्षणाला अजून वेळ लागणार ?