मुंबई : मराठा आंदोलनाला बीड जिल्ह्यात हिसंक वळण लागल्याने बीड आणि जालना शहरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्ह्यात संचारबंदी लागून करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनानंतर पोलीस यंत्रणा सतर्क मोडवर आली आहे. याच पार्श्वभूमीवर काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…“जाळपोळ झाली तेव्हा घरात होतो, काही लोकांनी ठरवून जाळपोळ केली”, योगेश क्षीरसागरांनी दिली प्रतिक्रिया
एक फुल आणि दोन हाफ सरकारच्या नाकर्तेपणा आणि वेळकाढू धोरणामुळे महाराष्ट्र पेटलेला आहे. आम्हाला असा पेटता महाराष्ट्र नको आहे. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र हवा आहे. भाजप सरकारमध्ये शेतकरी, कर्मचारी, तरूण कोणीच सुखी नाही. महागाईच्या भस्मासूर आहे तर दुसरीकडे अपुरा पगार मिळतो. कमी पगारात घरे चालवणे कठी आहे. महाराष्ट्रातील आजची परिस्थिती गंभीर आहे, असा महाराष्ट्र कधीच नव्हता, असा संतापही नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा…प्रवेश बंदी असताना आलेल्या आमदार विश्वजीत कदम यांना पाठवलं माघारी
दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलवली आहे. सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला आता सह्याद्री अतिथी गृहावर बैठक सुरू असून त्यात काय तोडगा निघणार? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…पुण्यातील आंदोलनप्रकरणी आतापर्यंत ४०० जणांवर गुन्हे दाखल, तर १२ हजार २९४ कुणबी प्रमाणपत्राचं वाटप
हेही वाचा…मराठा आरक्षणासंदर्भात राजकीय हालचाली वाढल्या, सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरू
हेही वाचा…बीडच्या घटनेत ३४ आरोपींना अटक..! “तर बीडला येईल आणि मराठे काय असतात ते कळेल”, मनोज जरांगे पाटलांनी दिला इशारा
हेही वाचा…“शिंदे समितीचा अहवाल प्राथमिक असून अजून काम करणं बाकी”, मराठा आरक्षणाला अजून वेळ लागणार ?
हेही वाचा…“घर जळत होतं, तेव्हा मुल देवा घरात हात जोडून होती,” क्षीरसागर कुटुंबीयांनी सांगितला धक्कादायक अनुभव