मुंबई : अधिवेशनामध्ये सर्व आमदारांना बोलण्याची संधी दिली पाहिजे. सर्वसामान्य जनतेचा मायबाप म्हणून आम्ही भूमिका मांडतो. हीच भूमिका मांडता येत नसेल तर काय उपयोग त्या जबाबदारीचा, आमदार खासदारकीचा. असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर रोष व्यक्त केला. तसेच मनोज जरांगे पाटलांनी सरकारला ४० दिवसांची मुदत दिली होती. त्याचं काय झालं? असा सवालही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.
हेही वाचा…मराठा आरक्षणासंदर्भात राजकीय हालचाली वाढल्या, सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरू
सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवा आणि विशेष अधिवेशन घ्या, अशी मागणी सातत्याने करीत आहे. राज्यातील मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, लिंगायत आरक्षण, आणि मुस्लिम आरक्षण यासंदर्भात सर्वात जास्तवेळा मुद्दा मांडणारी खासदार मी आहे. मनोज जरांगे पाटलांना ज्या प्रकारे दगाफटका केला आहे. त्याप्रकारे या राज्यातील सर्वांना त्यांनी दगाफटका केला आहे. देवेंद्र फडणवीस त्याच सरकारमध्ये आहेत ना . मग ४० दिवसाचा मॅजिक आकडा आणला कुठून? सातत्याने सगळ्या समाजाचा अपमान करा, त्यांना दुखवा, त्यांना फसवण्याचं काम भ्रष्ट जुमला पार्टीचं खोके सरकार करीत आहे. हेच त्यांचं अपयश आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…बीडच्या घटनेत ३४ आरोपींना अटक..! “तर बीडला येईल आणि मराठे काय असतात ते कळेल”, मनोज जरांगे पाटलांनी दिला इशारा
दरम्यान, सगळ्याच समाजाला भाजपने धोका दिला आहे. आज राज्यात कुणीही सुरक्षित नाही. त्याला सर्व राज्याचे गृहमंत्री जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. यातच त्यांनी शिंदेंना अपात्र केलं तर त्यांना आम्ही विधानसभेवर नेऊ असं देवेंद्र फडणवीस म्हणत आहे. त्यामुळे शिंदेंना देखील भाजपने फसवलं आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत आतापर्यंत काय काय झालं?” वाचा आतली बातमी
हेही वाचा…मराठा आंदोलन चिघळलं, सर्वपक्षीय आमदारांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
हेही वाचा…“आरक्षण मोडून काढण्याचा मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्याचा डाव,” जरांगे पाटलांनी व्यक्त केली शंका
हेही वाचा…“पेटता महाराष्ट्र नको तर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र हवा”
हेही वाचा…पुण्यातील आंदोलनप्रकरणी आतापर्यंत ४०० जणांवर गुन्हे दाखल, तर १२ हजार २९४ कुणबी प्रमाणपत्राचं वाटप