चिंचवड, पुणे : कंपनी व्यवस्थापनाने महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ या युनियनला स्विकारावे, तसेच संघटना स्थापन झाल्यापासून कंपनी व्यवस्थापनाने सुडबुद्धीने ३० कामगारांवर केलेल्या विविध कारवाया मागे घेण्यात यावे, यासह विविध मागण्यांसह चिंचवड येथील एक्साईड इंडस्ट्रीज कंपनीतील कामगारांनी संप पुकारला आहे. याप्रसंगीत संघटनेचे प्रदेश सचिव इश्वर वाघ, आणि युनियन कमिटी मेंबर दिलीप भोंडवे सुनिल राजगुरू, आत्माराम धुमाळ, सुनिल परसे, भाऊसाहेब कदम, रवींद्र खराडे, निखिल शेटे, गोकूळ झुरुंगे, संतोष तापकीर इत्यादी सर्व कामगारांनी संपात सहभाग घेतला आहे.
हेही वाचा…“पेटता महाराष्ट्र नको तर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र हवा”
महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटनेने याआधी कंपनीला संघटनेचे सर्व कायम कामगार सभासद बाबत नोटीस दिली होती. परंतु तरीही मागण्या मान्य न झाल्याने ०८ मे २०२३ पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला होता. परंतु त्यानंतर कामगार आयुक्तांनी यामध्ये सकारत्मक मध्यस्थी दर्शवत त्यांनी पत्राद्वारे संप मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार संघटनेने संपाला तात्पुरती स्थगिती दिली. या माध्यमातून सह्याद्री अतिथी गृहावर कामगार मंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीसाठी कंपनी व्यवस्थापनातर्फे व्यवस्थापनाचे अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर संघटना आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये समेट घडवणून आणण्याची चर्चा झाली.
हेही वाचा…पुण्यातील आंदोलनप्रकरणी आतापर्यंत ४०० जणांवर गुन्हे दाखल, तर १२ हजार २९४ कुणबी प्रमाणपत्राचं वाटप
गेल्या पाच महिन्याच्या कालावधीमध्ये संघटनेने व्यवस्थापनाला संपूर्ण सकारात्मक प्रतिसाद दिला. परंतु व्यवस्थापनाने आपले धोरण कायम ठेवत कामगारांच्या आणि कंपनीच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून अत्यंत घातक आणि जाचक अटी संघटनेसमोर मांडण्यात आल्या. यावरून एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड चिंचवड येथील संघटनेच्या सर्व कायम कामगार सभासदांनी रोजीच्या पहिल्या पाळीपासून बेमुदत संपावर जाण्याचा पुन्हा निर्णय घेतला.
हेही वाचा…मराठा आरक्षणासंदर्भात राजकीय हालचाली वाढल्या, सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरू
कंपनीत कार्यरत असणाऱ्या सर्व कामगारांपैकी शंभर टक्के सभासद संख्या ही महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ यांचे सभासद आणि कंपनीत दुसरी कोणतीही युनियन कार्यत नसल्याने संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यातच जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कामगारांचा संप हा बेमुदत कालावधीसाठी सुरूच राहिल अशी माहिती संघटनेने दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांनी मंजूर केला ठराव , मुख्यमंत्र्यांनीही केलं मोठं आवाहन
हेही वाचा…“सर्वच समाजाला फसवण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलंय, राजीनामा द्या,” सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
हेही वाचा…“सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत आतापर्यंत काय काय झालं?” वाचा आतली बातमी
हेही वाचा…मराठा आंदोलन चिघळलं, सर्वपक्षीय आमदारांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
हेही वाचा…“आरक्षण मोडून काढण्याचा मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्याचा डाव,” जरांगे पाटलांनी व्यक्त केली शंका