मुंबई : राज्यातील इडी सरकारने 50 खोके घेऊन लाल दिवा ओरबाडून मिळवला. तसेच राज्यातील इडी सरकार साम-दाम-दंड-भेद वापरून सत्तेत आलं असल्याची खरमरीत टिका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि शिंदे गटावर केली. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यासह शरद पवार यांच्यावर जहरी टिका केली आहे.
“52 पत्ते कितीही पिसले तरी त्यातील चार एक्के भाजपकडेच आहेत”; सुधीर मुनगंटीवार
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पवार कुटुंबियांना फार मोठं दु:ख झालं आहे. तसेच सुप्रिया ताईंना कुणी मोठं झालेलं पाहवत नाही. आपले वडिल हेच राज्यातले मुख्य आहेत. तेच राज्यात काही बदल करू शकतात. असा सुप्रिया ताईंचा समज आहे. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छेद दिला आहे. त्याला उपमुख्यमंत्र्यांची साथ मिळाली असल्याचंही ते म्हणाले.
“5 वर्षात आंबिल ओढ्याची भिंत बांधता आली नाही आणि रोप वे बांधणार, अन् बसेस पण उडवणार”
पुढे बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, सामान्य मराठा कुटुंबातील एक चांगला चेहरा राज्याचा मुख्यमंत्री झाला हे पवार कुटुंबाचे सर्वांत मोठे दु: ख आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चांगल्याप्रकारे काम करत आहेत. त्यामुळे त्यांना हे सहन होत नसल्याची टिका देखील गोपीचंद पडळकर यांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यावर केली आहे.
“त्रिकोण, चौक दाखवा जिथे माझ्या आईबापाचं नाव दिले, बापाची प्रॉपर्टी आहे का?”
दरम्यान, गेल्या अनेक दिवसापांसून राष्ट्रवादी आणि सत्ताधारी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहेत. सातत्याने राजकीय पक्ष एकमेकांवर चिखल फेकण्यात मागेपुढे पाहत नाही. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण एक वेगळ्याच दिशेने चालल्याचं आपण सर्वजण पाहत आलो आहे.
Read also
- “मुंबईत असणं हा एक विशेष अनुभव”; केंद्रीय मंत्री अमित शहाचं मराठीत सुचक ट्विट
- “..तर शिवसेना स्टाईलने त्यांचे थोबाड फोडू”; बुलढाण्यातील राड्यानंतर संजय गायकवाडांना शिवसेनेचा इशारा
- एसटीच्या 800 चालकांवर बेरोजगार होण्याची वेळ ; पडळकर, खोत, सदावर्ते कोणत्या बिळात जाऊन लपले ?
- “तुमची विचारधारा काँग्रेस आणि सेनेची आहे ती सांभाळा”; संजय गायकवाड
- बुलढाण्यात शिवसेनेच्या कार्यक्रमात शिंदे गटाच्या सैनिकांचा तुफान राडा