मुंबई : एसटी महामंडळातील तब्बल 2176 कंत्राटी चालकांच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले होते. मात्र कंत्राट घेऊनही कर्मचाऱ्यांची पूर्तता केली नसल्याने अखेर संबंधित कंत्राट शनिपासून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे 800 एसटी महामंडळातील चालकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. यावरून आता राष्ट्रवादीने भाजपवर निशाणा साधला आहे.
“राजकारण हा माझा धंदा नाही, तर हे माझं व्रत आहे”; खासदार गिरीश बापट
महाविकास आघाडी सरकार असताना एसटी आंदोलन चांगलंच गाजलं होतं. यावेळी भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. मात्र आता 800 चालकांवर बेरोजगार होण्याची वेळ आल्यानंतर भाजप नेते शांत का बसले आहेत. असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविंकांत वरपे यांनी केला आहे.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून शरद पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंना सबुरीचा सल्ला
महाविकास आघाडी सरकारच्या काळात एस.टी विलिनीकरण मागणीसाठी तांडव करणारे भाजपचे भाडोत्री नेते गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, गुणरत्ने सदावर्ते कोणत्या बिळात जाऊन लपले आहेत. शिंदे- फडणवीस सरकार आल्यापासून यांचा भाडेकरार संपला का ? असा खोचक सवाल देखील त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी राज्यपालांवर देखील निशाणा साधला आहे. राज्यपालांनी संविधानिक चौकटीत राहून काम केले पाहिजे. मात्र मागच्या अडीच वर्षाच्या काळात महाराष्ट्राच्या राज्यपालांनी मविआ सरकारची अडवणुक केली. मविआ सरकारने पाठवलेली 12 नावांची यादी का मंजून केली नाही?असाही सवाल त्यांनी केला.
“ज्याच्याकडे पाहून बाप्पालाही हसू येईल, तो केवढा मोठा जोकर असेल”; सोमय्यांवर काॅंग्रेसचा प्रहार
दरम्यान, महाविकास आघाडीचं सरकार असताना एसटी कर्मचाऱ्यांनी एसटीचं विलिनीकरण करण्यासाठी मोठं आंदोलन केलं होतं. त्यानंतर सरकार आणि एसटी कर्मचाऱ्यांमध्ये अनेक बैठका पार पडल्या होत्या. त्यांनतर त्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. एप्रिलमध्ये संप मिटल्यानंतर कर्मचारी पुन्हा कामावर रूजू झाले होते. परंतु त्यांच्यावर पूर्णपणे तोडगा काढला नसल्याने त्यांना आता बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.
Read also
- “तुमची विचारधारा काँग्रेस आणि सेनेची आहे ती सांभाळा”; संजय गायकवाड
- बुलढाण्यात शिवसेनेच्या कार्यक्रमात शिंदे गटाच्या सैनिकांचा तुफान राडा
- “52 पत्ते कितीही पिसले तरी त्यातील चार एक्के भाजपकडेच आहेत”; सुधीर मुनगंटीवार
- “5 वर्षात आंबिल ओढ्याची भिंत बांधता आली नाही आणि रोप वे बांधणार, अन् बसेस पण उडवणार”
- “त्रिकोण, चौक दाखवा जिथे माझ्या आईबापाचं नाव दिले, बापाची प्रॉपर्टी आहे का?”