पुणे : मी 50 वर्षे झाली राजकारणात आहे. पण कधी कोणावर व्यक्तिगत टिका केली नाही. मी जे काम केले ते नि:स्वार्थपणे केलं आहे. पण सध्याचे राजकारण पाहता मी वैयक्तिकरित्या माझ्या पक्षांसह सर्वांवर नाराज आहे असं मत व्यक्त करत. राजकारण हा माझा धंदा नाही, तर हे माझं व्रत आहे, असं वक्तव्य पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांनी केलं आहे.
“ठाकरेंचा मुलगा म्हणून आदित्य ठाकरे मंत्री झाले, ते सध्या बेडकासारख्या उड्या मारताय”; रामदास कदम
मी ५० वर्ष मी राजकारणात आहे. एक त्रिकोण, चौक दाखवा जिथे मी माझ्या आईबापाचं नाव दिले. ही कुठली प्रथा आहे. आपल्या बापाची प्रॉपर्टी आहे का? सातबारा आपल्या नावावर आहे का? लोकांनी काम करण्यासाठी निवडून दिलेय. लोकांसमोर आदर्श जात नाही. निर्मळ मनाने काम करायला हवं. अधिकाऱ्यांवर वचक निर्माण करण्याचं काम मी केले. आजकाल उद्धाटन, भूमिपूजन करतात, फोटो सोशल मीडियात टाकले जातात हे खरे काम नाही, असं गिरीश बापट म्हणाले.
“ज्यांच्याकडे सत्ता असते, ते हव्या त्या गोष्टी करतात”; अजित पवार
कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांच्या भूमिकेत राहावं. पक्ष त्याची दखल घेत असतो. लोकप्रतिनिधी होण्याची संधी सगळ्यांनाच मिळते असं नाही. जागा मर्यादित आहेत. आरक्षण आहेत. खरा निर्मळ आनंद लोकांचं काम करण्यात असतो. एखाद्याचं काम आपण केले तर त्याच्या चेहऱ्यावर हास्य येते याचा आनंद वाटतो. परंतु नव्या राजकीय संस्कृतीत काम सोडून बाकी सगळे सुरू आहे. हे आमच्यासारख्या जुन्या पिढीतील लोकांना पटत नाही. मग तो कुठल्याही पक्षाचा, भाजपाचाही असला तरी ते योग्य नाही, असं बापट म्हणाले.
“राज ठाकरेंचा आता कुठेतरी हिंदुत्वाचा मुकवटा खाली उतरला “; शिवसेनेची राज ठाकरेंवर टिका
राजकीय जीवनात आपण सामाजिक, शैक्षणिक काम करतो. पायाभूत समाजाच्या शेवटपर्यंत जाणे आणि प्रश्न सोडवणे हे आपलं काम आहे. परंतु आता कार्यकर्त्यामधील कार्य मेले अन् फक्त पुढारीच राहिला हे बरोबर वाटत नाही. ४०-४५ वर्ष आम्ही सतत काम करत राहिलो. आपली बांधिलकी समाजाशी आहे. समाज नोंद घेत असतो. मतांच्या राजकारणासाठी काहीही करत राहिलो तर ते चुकीचं आहे, असही बापट म्हणाले आहेत.
Read also
- शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून शरद पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंना सबुरीचा सल्ला
- “ज्याच्याकडे पाहून बाप्पालाही हसू येईल, तो केवढा मोठा जोकर असेल”; सोमय्यांवर काॅंग्रेसचा प्रहार
- राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी घेतली मुख्यमंत्र्याची भेट
- “भाजपचे राज्यातील अध्यक्षही अनभिज्ञ, त्यांना माहित झाल्यावर..;”रोहित पवारांचा खोचक टोला
- “शहाजी बापू संत्रा पिऊन बोलतात की हातभट्टीवरील तांब्या मारून बोलतात, हेच कळत नाही”