मुुंबई : आदित्य ठाकरे शिवसेना मंत्र्यांची खाती सांभाळायचा. कुणाला काम करू द्यायचा नाही. प्रदुषण नियंत्रण महामंडळाकडून पर्यावरण खात्यात १०० कोटी रुपये घेतलेत. त्याची चौकशी करण्याची मागणी करणार आहे. त्या १०० खोक्याचे काय केले? १०० कोटीचं काय केले? त्याचा हिशोब द्यावा लागेल. मातोश्रीत किती मिठाईचे खोके गेले?, असा सवाल शिंदे गटातील आमदार रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे.
“राज ठाकरेंच्या भेटीसाठी जावं, राजकीय युती करू नये”; भाजपला रामदास आठवलेंचा सल्ला
शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर बसले. उद्धव ठाकरेंचा मुलगा म्हणून आदित्य ठाकरे मंत्री झाले. ते बेडकासारख्या उड्या मारताय. आता तुम्ही महाराष्ट्रभर फिरताय, गेल्या अडीच वर्षात कुणाला भेटला? मातोश्री सोडलीच नाही, असा टोला आमदार रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
काँग्रेसला खिंडार पडणार?; अशोक चव्हाण आणि फडणवीसांची भेट, चर्चांना उधान
आदित्य ठाकरे याचं वय 31 वर्षे आहे आणि माझं राजकारणातील वय 52 वर्षे आहे. त्यांचा राजकारणाचा अभ्यास किती हे महाराष्ट्राला कळलं आहे. आपलं वय काय, आपण काय बोलतोय, ठाकरे कुंटुबातील आहोत याचे भान ठेवायला हवे होते. गुवाहाटीला गेलेले आमदार मतदारसंघात कसे पाय ठेवतात ते पाहू असं आदित्य ठाकरे म्हणाले. ते परतले, मतदारसंघात गेले. काय उखडलं तुम्ही? सगळे आमदार वरळी मतदारसंघातून गेले काय केले तुम्ही? आवाज द्यायचं आमच्या जीवावर देतात. अनेक केसेस आम्ही घेतल्यात. आम्ही पक्षासाठी केसेस घेतल्या तुमचं पक्षासाठी योगदान काय? असा सवाल कदम यांनी उपस्थित केला आहे.
“शिक्षकांचा प्रतिनिधी हा विधिमंडळात हवाच”; भाजप आमदाराच्या मागणीला राष्ट्रवादीचा विरोध
सोबतच, शिवसेनेचे नेते फक्त खोके..खोके बोलत आहेत. हे त्यांनी बोलावं यासारखे दुसरं आश्चर्य नाही. मातोश्रीला खोके नवीन नाहीत. आतापर्यंत मातोश्रीला किती मिठाईचे खोके गेले, हे आम्हाला माहिती आहे. याबद्दल आता आम्हाला तोंड उघडायला लावू नका, असा इशारा रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
Read also
- “ज्यांच्याकडे सत्ता असते, ते हव्या त्या गोष्टी करतात”; अजित पवार
- “राज ठाकरेंचा आता कुठेतरी हिंदुत्वाचा मुकवटा खाली उतरला “; शिवसेनेची राज ठाकरेंवर टिका
- “शिवसेनाप्रमुख म्हणून नाही पण प्रमुख नेते म्हणून एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार “; सदा सरवणकर
- “दानवे यांनी जास्त फडफड करू नये”; शिंदे गटाचा दानवेंना इशारा
- “मोदी सरकार हे भांडवलदारांचे सरकार”; राष्ट्रवादीचा घणाघाती आरोप