मुंबई : भाजपचे आमदार प्रशांत बंब आणि शिक्षक संघटना यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. मुख्यालयी न राहता घरभाडे उचलणारे शिक्षक शासनाची फसवणूक तर करतच आहे, पण आमच्या पिढ्या देखील बरबाद करत आहेत असा आरोप करत. शिक्षक, पधवीधर मतदारसंघ रद्द करा, अशी मागणी आमदार प्रशांत बंब यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने आमदार प्रशांत बंब यांच्यावर निशाणा साधला आहे.
“मोदी सरकार हे भांडवलदारांचे, हे आता स्पष्टचं झालंय”; राष्ट्रवादीचा भाजपला खोचक टोला
शिक्षक हा समाज उत्कर्षासाठी झटणारा समजतील घटक आहे. त्यांचा प्रतिनिधी हा विधिमंडळात हवाच. आज जे प्राप्त केले आहे ज्या स्तरावर आहे. त्यातील शिक्षकांचे योगदान विसरणे कृतघ्न पणाचे लक्षण आहे. शिक्षकांच्या व समाजाच्या अडचणी मांडण्यासाठी त्यांचा प्रतिनिधी विधिमंडळात हवाच, अशी टिका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्राशांत बंब यांच्यावर केली आहे.
“तुमच्या सिंहासनाला कधी सुरूंग लागेल, हे कळणार देखील नाही”; अमोल मिटकरी
नुकतेच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात 80 टक्के शिक्षक मुख्यालयी राहत नाहीत. शिक्षक, ग्रामसेवक, शासकी अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी न राहता फुकट घरभाडे घेतात, असा मुद्दा उपस्थित केला होता. आधी विधानसभेत कमी शिकलेले आमदार असायचे. त्यामुळे शिक्षक, प्राध्यापकांचे प्रश्न मांडण्यासाठी या मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली होती. आता बहुतांश आमदार हे शिकलेले, सुशिक्षित आहेत. त्यामुळे शिक्षक, मराठवाडा पद्वीधर मतदारसंघाची गरज राहिलेली नाही, असा दावा भाजप आमदार प्रशांत बंब यांनी केला आहे.
“राज ठाकरे हे प्रकरण शंभर टक्के गांभीर्याने घेतील”; किशोरी पेडणेकर
सोबतच, शिक्षकांबद्दल बंब अपमानजनक भाषा वापरतात. आई वडीलांची जागा शिक्षक घेत आसतो. म्हणजे बंब आपल्या आई वडीलांचा देखील अपमान करतात. याची जाण जर प्रतिनिधी असलेल्या बंब यांना नसेल तर त्यांच्या या वागण्यामुळे शिक्षक मतदारसंघाची गरज आहे हे सिद्ध होते. त्यांच्या या मागणीचा निषेध करतो. तसेच आमदार बंब यांची भाजप अध्यक्ष व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार आहे, अस भाजप समर्थित शिक्षक नागो गाणार म्हणाले आहेत.
Read also
- “प्रशांत बंब यांचं मानसिक संतुलन बिघडलंय का?”; शिक्षक आमदाराचा सवाल
- “आदित्य हे ठाकरे कुटुंबाचे वारसदार असू शकतात, शिवसेनेच्या विचारांचे नाही”
- ”भाजप करणार मिशन मुंबई महापालिकेचा शुभारंभ”; अमित शहा 5 सप्टेंबर रोजी मुंबईत
- “मिटकरींच्या विरोधातील सर्व पुरावे उघड करणार”; राष्ट्रवादीच्याच जिल्हाध्यक्षाचा मिटकरींना इशारा
- “शिंदे- फडणवीस सरकार म्हणजे इव्हेंट अन् इडीचं सरकार”; सुप्रिया सुळेंची टिका