मुंबई : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा येत्या 5 सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते लालबागचा राजा व सिद्धिविनायक या प्रमुख गणपतींचे दर्शन घेणार आहेत. याच दौऱ्यात अमित शहांच्या उपस्थितीत भाजप मिशन मुंबई महापालिकेचा शुभारंभ करणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती आखण्यासाठी अमित शहांच्या नेतृत्वात बैठक घेतली जाणार आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
“शिक्षक, पदवीधर मतदारसंघ रद्द करा”; प्रशांत बंब यांची मागणी
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप मोठी रणनीती आखत आहे. हिंदुत्वाच्या मुद्दावरून भाजप आता मनसेसोबत युती कऱण्याची शक्यता आहे. कारण अलिकडेच राज्यातील अनेक भाजपच्या नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, आणि आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.
रोकडा सवाल; मग हिंदु, मुस्लिम, शीख, बौद्ध, यांच्यासाठी पण वेगळे शौचालय बांधणार का ? जितेंद्र आव्हाड
त्याचदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील काल राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. कारण शिवसेना आणि पक्ष चिन्हाबाबत ठाकरे आणि शिंदे यांची न्यायालयीन लढाई सुरू आहे. जर एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निकाल लागला तर शिंदे गटाला एकतर पक्षात विलीन व्हावं लागेल किंवा स्वत: चा पक्ष स्थापन करावा लागेल. त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट महत्वाची मानली जात आहे.
“भाजपाची बॅनरबाजी म्हणजे थिल्लरपणा”; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मुंबई महापालिकेतील सत्ता राखण्यास कठिण जाणार आहे. अशातच अनेक माजी नगरसेवकांनी देखील शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याचाच फायदा भाजप येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत घेण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजप देखील मुंबई महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसत आहे.
Read also
- “मिटकरींच्या विरोधातील सर्व पुरावे उघड करणार”; राष्ट्रवादीच्याच जिल्हाध्यक्षाचा मिटकरींना इशारा
- “शिंदे- फडणवीस सरकार म्हणजे इव्हेंट अन् इडीचं सरकार”; सुप्रिया सुळेंची टिका
- “मोदी सरकार हे भांडवलदारांचे, हे आता स्पष्टचं झालंय”; राष्ट्रवादीचा भाजपला खोचक टोला
- “तुमच्या सिंहासनाला कधी सुरूंग लागेल, हे कळणार देखील नाही”; अमोल मिटकरी
- “राज ठाकरे हे प्रकरण शंभर टक्के गांभीर्याने घेतील”; किशोरी पेडणेकर