मुंबई : मोदी सरकार हे भांडवलदारांचे आहे, हे आम्ही आधीपासूनच बोलत आहोत. हे आता रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांच्या वाढत्या आत्महत्येवरुन स्पष्ट झाले आहे. मोदी सरकार आल्यानंतर रोजंदारी करणाऱ्यांसाठी व बेरोजगारांसाठी एक वाईट काळ सुरू झाला आहे, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.
शिंदे सरकारमध्ये 26 कॅबिनेट तर 17 राज्यमंत्री..! दिवाळीपुर्वी घेणार 7 कॅबिनेट तर 17 राज्यमंत्री शपथ
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा एक सर्व्हे प्रसिद्ध झाला असून त्यामध्ये भारतात रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांच्या आत्महत्यांचे प्रमाण जास्त आहे. याचा अर्थ देशातील सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने काहीच केले नाही, असा आरोपही महेश तपासे यांनी केला. पंतप्रधान मोदींनी नोटबंदी करुन सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले, शिवाय कोरोना काळात अचानक केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना नोकर्यांना मुकावे लागले होते. मात्र त्यांना दिलासा देण्याऐवजी मोठ्या भांडवलदारांची कर्जे माफ करून मोदी सरकारने ते भांडवलदारांच्या पाठिशी असल्याचे स्पष्ट केले, असेही महेश तपासे म्हणाले.
“बच्चू कडूंना गोड, खरं खार की तिखट द्यायचं हे शिंदे ठरवतील”; अब्दुल सत्तार
केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशातील जनतेला सतत वाढत्या महागाईचा सामना करावा लागतोय. केंद्राच्या चुकीच्या धोरणांविरोधात आक्रोश व्यक्त करण्याचे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी केले होते. त्या आवाहनानुसार आज संपूर्ण राज्यभर ’50 खोके, एकदम OK’ हे आंदोलन पुकारण्यात आले. केंद्र सरकारने घेतलेल्या चुकीच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनाला युवकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बॅनरबाजी
आतापर्यंत राज्यातील माजलगाव, राधानगरी, नाशिक, शिरूर कासार, तळोदा, नंदुरबार, नांदेड ग्रामीण, सांगली जिल्ह्यातील विटा, वाळवा, शिराळ तसेच पनवेल, परतूर, नंदुरबार शहर, धुळे, लातूर, अंबाजोगाई, आटपाडी, भुसावळ, अकोला शहर, या भागात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभाग घेतला.
Read also
- “तुमच्या सिंहासनाला कधी सुरूंग लागेल, हे कळणार देखील नाही”; अमोल मिटकरी
- “राज ठाकरे हे प्रकरण शंभर टक्के गांभीर्याने घेतील”; किशोरी पेडणेकर
- “शिक्षक, पदवीधर मतदारसंघ रद्द करा”; प्रशांत बंब यांची मागणी
- रोकडा सवाल; मग हिंदु, मुस्लिम, शीख, बौद्ध, यांच्यासाठी पण वेगळे शौचालय बांधणार का ? जितेंद्र आव्हाड
- “भाजपाची बॅनरबाजी म्हणजे थिल्लरपणा”; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल