मुंबई : भाजपचे आमदार प्रशांत बंब आणि शिक्षक संघटना यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. मुख्यालयी न राहता घरभाडे उचलणारे शिक्षक शासनाची फसवणूक तर करतच आहे, पण आमच्या पिढ्या देखील बरबाद करत आहेत असा आरोप करत. शिक्षक, पधवीधर मतदारसंघ रद्द करा, अशी मागणी आमदार प्रशांत बंब यांनी केली आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत राज्यात संतप्त प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहेत.
“शिंदे-फडणवीस सरकारमध्ये रासपला कॅबिनेट मंत्रिपद मिळावं”; महादेव जानकरांची मागणी
शंभर टक्के आमदार शिकलेले असतात. शिक्षक आणि पधवीधर मतदारसंघातील आमदार काय करायला लागलेत. जे शिक्षक खोटं वागत आहेत, खोटी कागदपत्रे तयार करत आहेत, फौजदारी स्वरूपाची कामे करत आहेत असे शिक्षक 80 टक्के आहेत. अश्या शिक्षकांना सपोर्ट करणाऱ्या शिक्षक आमदार आणि पधवीधर आमदार करायला लागले आहेत. या आमदारांची आता आपल्याला गरज नाही, असं आमदार बंब म्हणाले आहेत.
“ये मीठा है और कडू है..”; सत्तरांचा बच्चू कडूंना टोला
यावरून हा कोणाच्या बापाचा मतदारसंघ थोडी आहे. सातबारा आहे का की कधीही कोरा केला किंवा केव्हाही बोजा चढवला. आमदार प्रशांत बंब यांनी डोकं ठिकाणावर ठेवावं, असं अभिजित वंजारी म्हणाले आहेत. शिक्षक संघटना देखील बंब यांच्या आरोपानंतर आक्रमक झालेली आहे.
“शेतकऱ्यांवर चांगले दिवस येऊ देत”; नवनीत राणांचे गणरायाकडे साकडं
नुकतेच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात 80 टक्के शिक्षक मुख्यालयी राहत नाहीत. शिक्षक, ग्रामसेवक, शासकी अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी न राहता फुकट घरभाडे घेतात, असा मुद्दा उपस्थित केला होता. आधी विधानसभेत कमी शिकलेले आमदार असायचे. त्यामुळे शिक्षक, प्राध्यापकांचे प्रश्न मांडण्यासाठी या मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली होती. आता बहुतांश आमदार हे शिकलेले, सुशिक्षित आहेत. त्यामुळे शिक्षक, मराठवाडा पद्वीधर मतदारसंघाची गरज राहिलेली नाही, असा दावाही देखील बंब यांनी केला आहे.
Read also
- रोकडा सवाल; मग हिंदु, मुस्लिम, शीख, बौद्ध, यांच्यासाठी पण वेगळे शौचालय बांधणार का ? जितेंद्र आव्हाड
- “भाजपाची बॅनरबाजी म्हणजे थिल्लरपणा”; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल
- शिंदे सरकारमध्ये 26 कॅबिनेट तर 17 राज्यमंत्री..! दिवाळीपुर्वी घेणार 7 कॅबिनेट तर 17 राज्यमंत्री शपथ
- “बच्चू कडूंना गोड, खरं खार की तिखट द्यायचं हे शिंदे ठरवतील”; अब्दुल सत्तार
- आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बॅनरबाजी