मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सध्या 20 कॅबिनेट मंत्री आहेत. पहिल्या टप्प्यात महिला आणि अपक्ष आमदारांना स्थान देण्यात आलं नाही. तसेच दुसऱ्या टप्प्यात त्यांना स्थान देण्यात येईल असं अगोदरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शिंदे सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळाचा विस्तार दिवाळीपुर्वीच होणार असल्याचं स्पष्ट संकेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.
“येड्याची जत्रा आणि कारभारी सतरा”; शिवसेनेचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला
शिंदे फडणवीस सरकारमध्ये राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी एकाही जिल्ह्याला पालकमंत्री अद्यापही दिला नाही. पण सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार ऑक्टोबरमध्ये दिवाळीपुर्वी होईल, तसेच 288 आमदारांच्या 15 टक्केच मंत्री होऊ शकतात. त्यामुळे मंत्र्यांची संख्या 43 एवढीच असेल. असे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. यासंदर्भात अजूनही शिंदे गटातील मंत्र्यांनी प्रतिक्रिया दिल्या नाहीत, परंतु मंत्रिमंडळाचा विस्तार दिवाळीपुर्वी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
“उद्धव ठाकरे साधा सरपंच देखील होण्याच्या लायकीचा माणूस नाही”; राणेंची जहरी टिका
विरोधी पक्ष सातत्याने खातेवाटपावरून एकनाथ शिंदे आणि भाजपवर हल्लाबोल करीत आहे. भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिल्यानंतर महत्वाची खाती आपल्याकडे ठेवली आहेत. महसुल, उच्च व तंत्रशिक्षण, वने, आदिवासी विभाग, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम आणि अन्न नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण या खात्याचे मंत्री भाजपचे आहेत. तर पाणी पुरवठा व स्वच्छता, बंदरे व खनिकर्म, अन्न व औषध, रोजगार हमी योजना व फलोत्पादन, उद्योग सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, कृषी, शालेय शिक्षण, सहकार, राज्य उत्पादन शुल्क, पर्यटन, महिला व बालकल्याण या विभागाचे मंत्रिपद शिंदे गटांकडे देण्यात आले आहेत.
प्रहारचे नेते आहेत. त्याचं महाराष्ट्रात चांगलं काम आहे. मात्र त्यांच्या नावात कडू का आहे हे त्यांनाच विचारायला पाहिजे, असं अब्दुल सत्तार म्हणाले.
“मातोश्रीच्या अंगणात सुख, शांती लाभावी”; बंडखोर आमदाराचं गणपतीला साकडं
सध्या नगरविकास, परिवहन, मदत व पुनवर्सन, मृद व जलसंधारण आणि अल्पसंख्यांक या खात्यांचा कारभार मुख्यमंत्री शिंदे स्वत: पाहत आहेत. तर दुसरीकडे गृह, वित्त, गृहनिर्माण, जलसंपदा व ऊर्जा ही खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे आहेत. मंत्रीमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांकडे नगरविकास हे एकमेव खातं राहण्याची शक्यात असून त्यांच्या जागी नवीन मंत्र्यांकडे ही खाती देण्यात येईल. तसेच शिंदे फडणवीस सरकारमध्ये 26 कॅबिनेट आणि 17 राज्यमंत्री असतील. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात सात कॅबिनेट तर 17 राज्यमंत्र्यांचा विस्तार होणार आहे.
Read also
- “बच्चू कडूंना गोड, खरं खार की तिखट द्यायचं हे शिंदे ठरवतील”; अब्दुल सत्तार
- आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बॅनरबाजी
- “शिंदे-फडणवीस सरकारमध्ये रासपला कॅबिनेट मंत्रिपद मिळावं”; महादेव जानकरांची मागणी
- “ये मीठा है और कडू है..”; सत्तरांचा बच्चू कडूंना टोला
- “शेतकऱ्यांवर चांगले दिवस येऊ देत”; नवनीत राणांचे गणरायाकडे साकडं