अमरावती : कृषी मंत्री अब्दुल सत्तार मेळघाट दौऱ्यावर आहेत. सत्तार यांच्या या दौऱ्याची राज्यात चांगलीच चर्चा सुरू आहे. ते दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. या दौऱ्या दरम्यान मेळघाट मतदारसंघाचे प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांच्याशी बोलताना ‘ये मिठा है और बच्चू कडू है’ असं म्हणत सत्तार यांनी बच्चू कडूंवर निशाणा साधला आहे. यानंतर बच्चू कडूंना गोड, खरं खार की तिखट द्यायचं हे शिंदे ठरवतील असं म्हणून चिमटा देखील त्यांनी काढला.
“उद्धव ठाकरे साधा सरपंच देखील होण्याच्या लायकीचा माणूस नाही”; राणेंची जहरी टिका
राजकुमार पटेल यांनी सत्तार यांना आपली ओळख सांगितली तेव्हा ये मिठा है और बच्चू कडू है असं कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले आहेत. याबाबत बच्चू कडू यांच्या नावात कडू आहे आणि पटेल हे राजकुमार आहेत ते मिठा आहे. याचा राजकीय अर्थ काही वेगळा नाहीये. बच्चू कडू हे प्रहारचे नेते आहेत. त्याचं महाराष्ट्रात चांगलं काम आहे. मात्र त्यांच्या नावात कडू का आहे हे त्यांनाच विचारायला पाहिजे, असं अब्दुल सत्तार म्हणाले.
“मातोश्रीच्या अंगणात सुख, शांती लाभावी”; बंडखोर आमदाराचं गणपतीला साकडं
मंत्रिपद न मिळाल्याने बच्चू कडू नाराज राहत नाहीत. बच्चू कडू हे शेतकऱ्यांचा कैवारी म्हणुन आवाज उठवणारा नेता आहे. त्यांच्याबद्धल कोणीही मिश्किल टिप्पणी करू शकत नाही. तेच सर्वांची मिश्किल टिप्पणी करत असतात. परंतु राजकुमार पटेल आणि बच्चू कडू यांची जोडी राम-लखन सारखी आहे. दोघामध्ये खुप प्रेम आहे. तर बच्चू कडूंना गोड, खरं खार की तिखट द्यायचं हे शिंदे ठरवतील, असं मंत्री अब्दुल सत्तार यांनी कडू यांच्या मंत्रिपदाबाबत वक्तव्य केलं आहे.
अन् चंद्रकांत पाटील अडकले गर्दीत, मोटारसायकलवरून पुण्यात केला प्रवास
सपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष अब्दुल सत्तार यांच्या दौऱ्यावर आहे. सत्तार हे मेळघाट दौऱ्यावर आहेत ते शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. दौऱ्यावेळी त्यांनी चुन्नीलाल पटेल यांच्या घरी पाहुणचार घेतला. त्यांनी रानभाजी आणि भाकरीचे जेवण शेतकऱ्यांसोबत केले. तर शेतकऱ्यांच्या घरी रात्री मुक्काम करत सकाळी पहाटे दौऱ्याला सुरूवात केली आहे.
Read also
- आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बॅनरबाजी
- “शिंदे-फडणवीस सरकारमध्ये रासपला कॅबिनेट मंत्रिपद मिळावं”; महादेव जानकरांची मागणी
- “ये मीठा है और कडू है..”; सत्तरांचा बच्चू कडूंना टोला
- “शेतकऱ्यांवर चांगले दिवस येऊ देत”; नवनीत राणांचे गणरायाकडे साकडं
- “येड्याची जत्रा आणि कारभारी सतरा”; शिवसेनेचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला