मुंबई : भाजपचे आमदार प्रशांत बंब आणि शिक्षक संघटना यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. शिक्षक, पधवीधर मतदारसंघ रद्द करा, अशी मागणी आमदार प्रशांत बंब यांनी केली आहे. त्यानंतर शिक्षकांमध्ये रोष पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशांत बंब यांचं मानसिक संतुलन बिघडलंय का?, असा सवाल भाजप समर्थित शिक्षक आमदार नागो गाणार यांनी केला आहे.
“तुमच्या सिंहासनाला कधी सुरूंग लागेल, हे कळणार देखील नाही”; अमोल मिटकरी
प्रशांत बंब हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. धोरणात्मक बाबतीत शिक्षक आणि पधवीधर मतदार संघ रद्द करावा अशी ते मागणी करत आहेत. त्यांना भारतीय जनता पक्षाने रोखले पाहिजे. कारण धोरणात्मक घोषणा करणं ही व्यक्तिगत बाब नसते. याबाबतीत जर भाजप पक्ष गप्प राहिला तर हे धोरण भाजपचे आहे असा संदेश समाजापर्यंत पोहचेल. म्हणुन प्रशांत बंब यांना भाजपने योग्य ताकीद दिली पाहिजे, अशी मागणी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी केली आहे.
“राज ठाकरे हे प्रकरण शंभर टक्के गांभीर्याने घेतील”; किशोरी पेडणेकर
शिक्षकांबद्दल बंब अपमानजनक भाषा वापरतात. आई वडीलांची जागा शिक्षक घेत आसतो. म्हणजे बंब आपल्या आई वडीलांचा देखील अपमान करतात. याची जाण जर प्रतिनिधी असलेल्या बंब यांना नसेल तर त्यांच्या या वागण्यामुळे शिक्षक मतदारसंघाची गरज आहे हे सिद्ध होते. त्यांच्या या मागणीचा निषेध करतो. तसेच आमदार बंब यांची भाजप अध्यक्ष व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार आहे, असही नागो गाणार म्हणाले.
“शिक्षक, पदवीधर मतदारसंघ रद्द करा”; प्रशांत बंब यांची मागणी
बंब यांचा निषेध महाराष्ट्र शिक्षक परिषदेने केलेला आहे. यामध्ये पक्षाचा नाही तर विचारांचा, भुमिकेचा प्रश्न आहे. काही तरी उलट सुलट बोलुन प्रकाशात राहणे असा त्यांचा नेहमीचा स्वभाव आहे. त्यांचा पोरकटपणा, जखलटपणा पक्षानी रोखला पाहिजे नाहीतर बदनामी पक्षाची होईल. खरं म्हणजे असं रागात जो बोलतो यावरून त्यांची मानसिकतेची तपासणी केली पाहिजे, असं म्हणत गाणार यांनी बंब यांना टोला लगावला आहे.
Read also
- “आदित्य हे ठाकरे कुटुंबाचे वारसदार असू शकतात, शिवसेनेच्या विचारांचे नाही”
- ”भाजप करणार मिशन मुंबई महापालिकेचा शुभारंभ”; अमित शहा 5 सप्टेंबर रोजी मुंबईत
- “मिटकरींच्या विरोधातील सर्व पुरावे उघड करणार”; राष्ट्रवादीच्याच जिल्हाध्यक्षाचा मिटकरींना इशारा
- “शिंदे- फडणवीस सरकार म्हणजे इव्हेंट अन् इडीचं सरकार”; सुप्रिया सुळेंची टिका
- “मोदी सरकार हे भांडवलदारांचे, हे आता स्पष्टचं झालंय”; राष्ट्रवादीचा भाजपला खोचक टोला