मुंबई : आम्ही शिवसेनेत गेल्या ३५ वर्षांपासून काम करीत आहोत आणि ३२ वर्षांचे आदित्य ठाकरे हे आमच्यावर गद्दार असल्याचा शिक्का मारतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका करतात, हे योग्य आहे का ?. आदित्य ठाकरे हे ठाकरे कुटुंबाचे वारसदार असू शकतात. मात्र, शिवसेनेच्या विचारांचे वारसदार नाही, अशी घणाघाती टिका पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी युवासेनेचे अध्यक्ष व आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे.
“राज ठाकरे हे प्रकरण शंभर टक्के गांभीर्याने घेतील”; किशोरी पेडणेकर
आम्ही केलेला उठाव हा शिवसेनेच्या भल्यासाठी आहे. आमची उद्धव ठाकरे यांच्यावर नाराजी नाही. मात्र, ज्यांनी उद्धव ठाकरे यांना घेरले आहे. त्यांच्यासोबत आहे. शिवसेनेची सद्य स्थिती ही केवळ खासदार संजय राऊत यांच्यामुळेच निर्माण झाली आहे, असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर ही निशाणा साधला आहे.
“शिक्षक, पदवीधर मतदारसंघ रद्द करा”; प्रशांत बंब यांची मागणी
शिवसेना फुटू नये म्हणुन आम्हीही प्रयत्न केले. शिवसेना सोडुन जाण्याआधी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सर्वांना बोलावून घेण्याची मागणी केली. सर्व घडण्याच्या चार महिने आधी देखील उद्धव ठाकरे यांची भेट घेत आमदार नाराज असल्याची कल्पना दिली होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी बघू, करू असं म्हणत टाळाटाळ केली. उठावानंतर जिथे आहोत त्या ठिकाणी ठिक आहोत. यासोबतच उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिंदे गटाचा समेटाबाबत गुलाबराव पाटील यांनी स्पष्ठ नकार दिला आहे.
रोकडा सवाल; मग हिंदु, मुस्लिम, शीख, बौद्ध, यांच्यासाठी पण वेगळे शौचालय बांधणार का ? जितेंद्र आव्हाड
मुख्यमंत्री शिवसेनेच्या आमदारांना भेटत नाहीत. आमदारांनी आपल्या समस्या कोणाकडे मांडायच्या, अशी समस्या होती. पक्षाचे एक नाही तर आठ मंत्री सोडुन गेले, त्यांच्यासोबत 40 आमदार गेले मात्र त्यांना या बाबत काहीही वाटलं नाही. त्यांनी थांबवावे, आम्ही समजावायला गेलो तर संजय राऊत म्हणाले की, दिसतात तर सिंहा सारखे मात्र ह्रद्य उंदरासारखे आहे असं राऊत म्हणाले, असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
Read also
- ”भाजप करणार मिशन मुंबई महापालिकेचा शुभारंभ”; अमित शहा 5 सप्टेंबर रोजी मुंबईत
- “मिटकरींच्या विरोधातील सर्व पुरावे उघड करणार”; राष्ट्रवादीच्याच जिल्हाध्यक्षाचा मिटकरींना इशारा
- “शिंदे- फडणवीस सरकार म्हणजे इव्हेंट अन् इडीचं सरकार”; सुप्रिया सुळेंची टिका
- “मोदी सरकार हे भांडवलदारांचे, हे आता स्पष्टचं झालंय”; राष्ट्रवादीचा भाजपला खोचक टोला
- “तुमच्या सिंहासनाला कधी सुरूंग लागेल, हे कळणार देखील नाही”; अमोल मिटकरी